Sunday, December 16, 2012

एक धुंद से आना हैं एक धुंद में जाना हैं !



ह्या आठवड्यात १४-डिसेंबर-२०१२ ला पडलेल्या दाट धुक्याने मला धुंद चित्रपटातील साहीर लुधियानवी ह्यांनी लिहिलेल्या आणि रवि यांनी संगीत बद्ध केलेल्या गाण्याची आठवण झाली. मला आवडणाऱ्या काही philosophical सुंदर गाण्यां पैकी हे एक अप्रतिम गाणे
संसारकी की हर शय का इतनाही फ़साना हैं 
एक धुंद से आना हैं एक धुंद में जाना हैं !

ये राह कहाँ से हैं ये राह कहाँ तक हैं 
ये राज़ कोई राही समझा हैं न जाना हैं !

एक पल की पलक पर है ठहरी हुई ये दुनिया 
एक पल के झपकने तक हर खेल सुहाना हैं !

क्या जाने कोई किस पल किस मोड़ पर क्या बीते 
इस रह में ऐ राही हर मोड़ बहाना हैं !






Saturday, December 8, 2012

SAVE Water SAVE life



Do one thing Each Day that will save water

अशी एक गोष्ट रोज करा ज्याने पाणी वाचेल.
त्यापैकी एक म्हणजे फक्त लघवीला गेल्यानंतर पूर्ण फ्लश वापरून आपण जे पाणी वाया घालवतो आहे ते कमी  फलश वापरून किंवा  मगने पाणी ओतून आपण किती तरी पाणी वाचवू शकतो.
विचार करा आणि रोजची तुमची सवय बदला. 
तुमची एक साधी सवय किती तरी पाणी वाचवू  शकते.
Why does the toilet "flush" when you pour a mug of water into it? Or use half-flush and save water.
खरे म्हणजे बिल्डर आणि राजकारणी मिळून मोठ मोठे हौसिंग कॉम्प्लेक्स बांधतांना ह्या गोष्टीचा विचार करून त्या दृष्टीने 
आधीच पाऊले उचलू शकतात . त्या दृष्टीने आधीच तशे Toilets दिले तर तो  अधिक योग्य उपाय असू शकतो.
मला असे वाटते   मोठे हौसिंग कॉम्प्लेक्स ला परवानगी देण्यापूर्वी सरकार जर खालील गोष्टी बंधनकारक करेल तर भविष्यात 
भेडसावणारा पाण्याचा प्रश्न आपण कमी करू शकू.
1)Toilets with water saving facilities.  Example: Half flush facility.
2)Dual Plumbing system  & water harvesting for reuse of water


More tips to Save Water


There are a number of ways to save water, and they all start with YOU.
  • Check all faucets, pipes and toilets for leaks.
  • Install water saving showerheads and ultra-low-flush toilets.
  • Take shorter showers.
  • Never use your toilet as an ashtray or wastebasket.
  • Turn off the water while brushing your teeth or shaving.
  • Instead of cleaning terrace everyday with pouring water by Buckets clean  it with wet cloth.
  • बादल्या  ओतून रोज टेरेस धुण्यापेक्षा अधून मधून ओल्या फडक्याने पुसायची सवय लावा !
  • तुमच्या बाईला समजावून तुम्ही कितीतरी पाणी वाचवू  शकतात.
Save water it will save you later!


Saturday, November 24, 2012

आपण काय "धडा" शिकलो ?

social networking website वरील comment आणि त्यावर झालेली कार्यवाही ह्यावर खूप चर्चा झाली आणि सर्वांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मुलीला clean chit देवून पोलिसांची कार्यवाही चुकीची ठरवली. पण पोलिसांची कार्यवाही चुकीची ठरली म्हणून त्या मुलीने जे केले त्याचे समर्थन होऊ शकते का?
कार्यवाही चुकीची म्हणजे दुसरी बाजू बरोबरच असा निर्णय असू शकत नाही. थोडक्यात तुम्ही नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल दोन्ही बाजूंकडून "समन्जसपणा" अपेक्षित होता. समाजात राहायचे म्हणजे "उचलली जीभ आणि लावली टाळ्याला" आणि कीबोर्ड आहे म्हणून बडवल्या कीज आणि टाकले कॉमेंट असे करून चालत नाही. त्यामुळे मुलांना social responsibility ची सुसंकृत जाणीव करून देणे हे त्याच्या पालकांचे आणि शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे तेथेच जर आपण चुकत असू तर असे प्रसंग वारंवार घडतील.

Freedom of expression comes with responsibilities, especially when it comes with serious implications for peace. - Mohammed Morsi
With great power comes great responsibility


29-Nov-2012

मी वर जे विचार मांडले तेच आज एका TV News Channel वर Responsible netizen ह्या मथळ्याखाली ऐकायला मिळाले. शेवटी एक गोष्ट सांगावीशी वाटते फक्त facebook likes साठी टाकण्यात आलेल्या immature विचारांना किती गांभीर्याने घ्यायचे ह्याचापण विचार सुजाण नागरिकांनी करावयास हवा. नाहीतर ज्या मुद्द्यासाठी आपण पेटून उठलो होतो तो मुद्दा बाजूला सारून आपापली राजकारणी पोळी भाजून घेण्यात एका पेक्षा एक डोकेबाज राजकारणी तुम्हाला पदोपदी बघावयास मिळतील.

तरुणांना एक सांगावेसे वाटते . मुद्दा विचारपूर्वक मांडा आणि त्यावर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर मग मागे वळू नका .

मत करो विश्वास उसपर जो परंपरा से पास आया हैं!
मत करो विश्वास केवल इसलिए की गुरु ने बताया हैं!
स्वयंम ही परिख्षण करो निरिक्षण करो!
फिर पाओ जो विचार कल्याण का सब प्राणियोंका
तो जुड़कर रहो उससे!
वही होगा पथप्रदर्शक!
क्यूंकि वोह विचार होगा स्वनिर्मित..!
इसलिए होगा सुनिश्चित!

--गौतम बुद्ध!





Sunday, October 14, 2012

छंद आणि आवड जोपासतांना...

मी माझ्या मागील एका पोस्ट मध्ये खालील तीन  प्रश्न स्वतःच्या मनाला विचारावे असे लिहिले होते
१) तुम्हाला तुमचे ८ तासाचे काम आवडते काय?
२)काम केल्यानंतर तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी तुमच्याजवळ पुरेसा वेळ आहे का?
३)तुमच्या जवळ स्वकष्टाचा तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा आहे का?

http://sanjeevchaudhary.blogspot.in/2012/09/blog-post_22.html

यातील पहिल्याच प्रश्नाचे हो उत्तर येणारे भाग्यवान कमी असतात. पण उत्तर नाही आले म्हणून काही लगेच कोणी पटकन नशिबी आलेले
काम बदलवू शकत नाही. पण जगण्या साठी आवडीचे काम असो वा नसो काम करावेच लागते. पण कामा व्यतिरिक्त मन आनंदी ठेवण्यासाठी बरेच लोक एखादा आवडीचा छंद जोपासतात. असा एखादा आवडीचा छंद जोपासण्यासाठी वेळ काढावा लागतो. वेळ नाही वेळ नाही असे म्हणून आवडीच्या छंदाला छेद देणे हा एक प्रकारे स्वतःवर अन्याय असतो. काही भाग्यवान लोकांना आवडीच्या छंदाचा व्यवसाय करण्याची संधी मिळते.

तुमच्या आवडीच्या छंदाचे व्यवसायात रुपांतर करणे ह्याला तपश्चर्या लागते.

मला script writer व्हायचे होते आणि कुमार वयात काय व्हायचे आहे असे कोणी विचारले तर मनातल्या मनात यश चोप्रा उत्तर यायचे पण सामाजिक भान ठेवून Engineer असे उत्तर मी द्यायचो. मी Electronics Engineer झालो आणि काळाची पावले ओळखून कॉम्पुटर आयटी क्षेत्रात
करीयर केले. मला ह्या क्षेत्रात काम करावयास मिळाले हे मी माझे भाग्यच समजतो. ह्या क्षेत्राने भारतातील अनेक कुटुंबांमध्ये आणि पर्यायाने देशामध्ये सुबत्ता आणली. मोठ्या पगाराच्या नौकारीचे दुहेरी इंजिन अनेक lower class कुटुंबांना  upper middle class श्रेणीत घेऊन गेले. ह्याचाच फायदा घेऊन बिल्डर आणि राजकारण्यांनी घरांच्या किमती अवाच्या सवा वाढवून आपली वैयक्तिक तिजोरी भरून घेतली.
मला एक गोष्ट काळत नाही मनात आणले तर पैसा गोळा करण्याची आवड जोपासताना राजकारणी जनतेसाठी काही हिताचे निर्णय पण घेऊ शकतात. फक्त थोडा त्याग दाखवण्याची तयारी हवी असते. पण मला विश्वास आहे हळू हळू राजकारणी त्यांची अति पैसा गोळा करण्याची हाव कमी करून जनतेच्या भल्याचे निर्णय घेण्याची आवड जोपासायला सुरुवात करतील.

उम्मीद पे दुनिया कायम हैं!
असो.


तर संगावयाचा मुद्दा असा ह्या आईटी क्षेत्राने भारताला बरेच काही दिले हे खरे. अणि आज प्रत्येक क्षेत्रामधे आईटी चा उपयोग होत आहे. असे एकही क्षेत्र नहीं जिथे कंप्यूटर अणि आईटी चा उपयोग नहीं. खरे म्हणजे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात करियर करावयाचे असेल तरी ह्या क्षेत्राचे मुलभुत ज्ञान असणे तुमच्या पुढील प्रगति साथी आवश्यक झाले आहे. माझी आवड script writer व्हावे अशी होती पण काळाची पाऊले ओळखून मी कॉम्पुटर भाषा शिकून कॉम्पुटर script लिहायला शिकलो आणि थोड्या प्रमाणात का होईना माझ्या आवडीशी संलग्न राहिलो. 

माझा मुलगा हर्षवर्धन ह्याला रोटरी क्लबच्या एकांकिका स्पर्धे मध्ये रोटरी क्लब शिवाजी नगर पुणे तर्फे एका एकांकी मध्ये काम करण्याची संधी मिळाली रोटरी तर्फे त्याला मिळालेल्या ह्या संधीचे त्याने सोने करून दाखवले आणि त्या दिवशी रोटरी सभासदांनी आणि प्रेक्षकांनी त्याच्या केलेल्या कौतुकामुळे आम्ही त्याचे पालक आहोत ह्याचा आम्हाला अभिमान वाटला.

Thanks to all "देता देता एक दिवस टीम"


आवड आणि छंद जोपासतांना एक सांगावेसे वाटते बरीच मुले आयुष्याच्या महत्वाच्या पहिल्या वळणावरच (गद्धे पंचविशीत) छंद जोपासण्यासाठी आयुष्याची वाट हरवून बसतात. आयुष्यात एक FIX Income प्लान महत्वाचा असतो, आवड आणि छंद जोपासण्यासाठी नंतर उभे आयुष्य असते. आयुष्यातील खरा आनंद मिळवण्यासाठी आयुष्यातील एका ठराविक वळणानंतर तुम्ही low profile आयुष्याची निवड करावयास हवी. शेवटी तुमचा आनंद कश्यात आहे हे फक्त तुम्हीच ठरवू शकतात.

fix Income प्लान च्या पायावर उभारलेला तुमच्या आवडीच्या छंदाचा इमला तुम्हाला निखळ आनंद देईल
अन्यथा आयुष्यात कराव्या लागणाऱ्या तडजोडी मुळे तुमच्या आवडीच्या छंदातील आनंदाला काळजीच्या व्यथेची किनार फक्त दुक्ख देऊन जाईल.




नेट सर्फिंग करीत असतांना मला एका article मधे खालील विचार वाचावयास मिळाले.
मला ते पटले पण नीट विचार केला तर तुम्हाला जाणवेल ह्या विचारांचा एकूण सार म्हणजेच "गीता सार"

5 Ways To Be Satisfied In Any Job - (Aol Jobs)
1. Start focusing on the process, rather than the outcome.
2. Realize that passion comes from you, not from your job
3. Stop labeling events as ‘good’ or ‘bad.’
4. Realize that you are playing a role.
5. Know how to let things go.


"गीता सार"
"Karmanye Vadhikaraste, Ma phaleshou kada chana,
Ma Karma Phala Hetur Bhurmatey Sangostva Akarmani"
"

कर्म पर ही तुम्हारा अधिकार हैं! कर्मोंका का फल तुम्हारा उद्देश्य नहीं होना चाहिए
और ऐसाभी न हो कर्म न करनेके प्रति तुम्हारी आसक्ति बढे!
जो हुआ, वह अच्छा हुआ, जो हो रहा है, वहअच्छा हो रहा है, जो होगा, वह भी अच्छा हीहोगा।
तुम्हारा क्या गया, जो तुम रोते हो? तुम क्यालाए थे, जो तुमने खो दिया? तुमने क्या पैदाकिया था, जो नाश हो गया? 
जो लिया यहीं से लिया। जो दिया, यहींपर दिया।


"वरील विचार तुम्हाला मान्य नसतील आणि तुमचा Process अथवा system लाच विरोध असेल तर
तुम्ही Top management मध्ये जाऊन Process अथवा System बदलण्याचा प्रयत्न करावयास हवा.
परंतु त्या साठी लागतात अविरत कर्म अपरिमित कष्ट. ते करण्याची तयारी न दाखवता फक्त टीका
तुमच्या समस्येचे समाधान होऊ शकत नाही."




गीता - आशावादी विचार - acceptance of life




Acceptance & Negation of life

गीता 5 हजार वर्षापूर्वी एक आशावादी विचार देऊन गेली जो आज पर्येंत टिकून आहे.परंतु त्यानंतर २५०० वर्षानंतर गौतम बुद्धांनी विचार करायला लावणारा एक विचार दिला तो जीवनातील निराशावाद दर्शवितो अशा आणि निराशा एकाच जीवनाच्या दोन बाजू आहेत कोण वाईट कोण चांगले असे एकदम judgmental होउन आपण निर्णय घेऊ शकत नाही. विमानाचा शोध एका आशावादी विचाराचा विजय हवाई छत्री Plane Parachutes एका निराशावादातून जन्मलेला शोध. पण दोघांचाही उपयोग महत्वाचा.




मत करो विश्वास उसपर जो परंपरा से पास आया हैं!
मत करो विश्वास केवल इसलिए की गुरु ने बताया हैं!
स्वयंम ही परिख्षण करो निरिक्षण करो!
फिर पाओ जो विचार कल्याण का सब प्राणियोंका
तो जुड़कर रहो उससे!
वही होगा पथप्रदर्शक!
क्यूंकि वोह विचार होगा स्वनिर्मित..!
इसलिए होगा सुनिश्चित!

--गौतम बुद्ध!




Sunday, September 30, 2012

PSR - झाडे आणि मुले वाढ्वितांना...

झाडे लावा झाडे लावा असे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत पण फक्त झाडे लावल्यामुळे आपले कर्तव्य संपते असे नाही. झाडे लावल्यानंतर ती जगवणे जास्त महत्वाचे असते . त्या साठी काही महिने काही वर्ष ती झाडे स्वावलंबी होई पर्येंत त्यांची काळजी घेणे गरजेचे असते. जी गोष्ट आपल्या मुलांसाठी लागू होते आणि आपण आपले कर्तव्य म्हणून पार पडतो तशीच काळजी आपण झाडांची घ्यावयाची असते.

आमच्या सोसायटीच्या मागे टेकडी आहे त्या टेकडीवर एक हनुमान मंदिर आहे आणि बरीच मंडळी सकाळ संध्याकाळ ह्या टेकडीवर झाडे लावून त्यांची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करीत असतात. ह्या पावसाळ्यात

मी पण त्या टेकडीवर १५ झाडे लावली आहेत. आणि झाडे लावण्याचे एक तंत्र मी ह्या मंडळीन कडून शिकलो आहे. झाड लावताना खोल खड्डा खणल्या नंतर त्या झाडा शेजारीच ते एक बुड कापलेली बाटली

लावावी. मग रोज टेकडीवर फिरायला येतांना पाण्याच्या बाटल्या घेवून याव्यात आणि ह्या बाटलीत ते पाणी घालावे म्हणजे कमी पाणी झाडाच्या मुळा पर्येंत पोहचण्याची सोय होते आणि कमी पाण्यात झाडे जागविता येतात.

तर तुम्हीपण फिरायला जातांना पाण्याची बाटली बरोबर घेऊन जात जा आणि काही झाडे दत्तक घेउन त्यांना
स्वावलंबी होई पर्येंत वाढवण्याची जबाबदारी स्वीकारा. मी ह्याला PSR - Personal Social Responsibility असे म्हणतो.

हाच नियम मूला - मुलींसाठी सुद्धा लागू पडतो . तुमची मुले स्वावलंबी होई पर्येंत त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आपले कर्तव्य असते. आणि आता तर फक्त चांगल्या विद्यालयातून चांगली डिग्री मिळवली म्हणजे नौकरी मिळेल असे चित्र आता राहिले नाही. चांगल्या डिग्री सोबत नवीन अद्यावत कौशल्ये शिकणे (Adding additional current new skill sets to our resume) हि काळाची गरज झालेली आहे. ईश्वर कृपेने माझा IT - Information technology क्षेत्रात चांगला अनुभव झाला आहे. तोच अनुभव आणि ज्ञान नवीन तरुण पिढीशी Share करावे हे माझ्या PSR (Personal Social responsibility) मधील एक Target असेल.

तर तुम्ही पण तुमचे PSR Target ठरवा आणि पूर्ण करा.






दिनांक :५-ऑक्टोबर-२०१२
जनहित याचिका

काल टेकडीवर गेलो असतांना एका विचित्र घटनेने मन विचलित झाले.
आमच्या मागील हनुमान टेकडीवर सेवाभावी मंडळींनी झाडांच्या शेजारी मुळा पर्येंत पाणी झीरपण्यासाठी बुड कापून लावलेल्या ३0-३५ बाटल्या कुणी तरी काढून टाकल्या होत्या.
प्रथम मला वाटले हे भंगारवाल्यांचे काम असावे. पण नंतर असेही कळले कि हे टेकडी स्वच्छ करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे पण काम असू शकते. आणि तसे असेल तर त्या सेवाभावी संस्थेचे जाहीर कौतुकच करावयास हवे. टेकडी प्लास्टिक मुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी त्यांना फक्त नेमक्या त्याच
३०-३५ बाटल्या दिसल्या ह्या बद्दल ते जाहीर सन्माना साठी नक्कीच लायक आहेत. त्या व्यतिरिक्त तेथे पडलेला दुसरा कचरा त्यांना दिसला नाही. तर तुम्हाला ह्या सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यान बद्दल काही माहिती असेल किंवा त्यांना माहिती देणार्यान बद्दल काही माहिती असल्यास त्वरित कळवावे

त्या सेवाभावी माणसाला मला एक सुचवावेसे वाटते कि बाटल्या काढून टाकण्या ऐवजी बाटल्या लावणाऱ्या सेवाभावी लोकांना झाडे जगल्यानंतर काही महिन्यांनी बाटल्या काढून टाकाव्यात अशी सूचना केली असती तरी समजण्या सारखे होते.
पण....असो.


देव तारी त्याला कोण मारी.

सकाळ पासून पडणारा उत्तम पाउस झाडांना जागविण्या साठी पुरेसा आहे.काही लोक नियमांचा उपयोग फक्त लोकांना त्रास देण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठीच करतात
तर काही लोक नियम धाब्यावर बसवून लोकांच्या भल्यासाठी काम करतात. ह्या पैकी योग्य अयोग्य हे ठरविणारी रेषा खूप सूक्ष्म असते.

नियम ह्यामधील जो "यम" आहे तो कधीच बदलत नसतो "नियम" मात्र कालानुरूप बदलत असतात. खरे बघितले तर नियम हे समाज सुधारणे साठीसमाजातील लोकांच्या भल्या साठी असतात पण प्रत्येक नियमात एक पळवाट लपलेली असते किंवा त्याच नियमाचा उपयोग त्रास देण्यासाठी सुद्धा करता येतो.ते शोधून त्याचा दुरुपयोग करणे आणि नियम करणार्यांनी त्याच्याकडे काना डोळा करून समर्थन करणे हे प्रकार जेव्हा समाजात वाढत जातात तेव्हा समाज व्यवस्था रसातळाला जाण्यास सुरुवात होते. तेव्हा समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने नियमातील यमाचा विचार करूनच नियम पाळावयास हवेत.नियम म्हणजे जे काळनुरूप बदलत जातात. नियमातील यम हा भाग त्रिकालाबाधित सत्य असतो आणि तसाच राहतो. ह्याचे भान समाजातील सर्व लोकांनी ठेवणे आवश्यक असते.


Sunday, September 23, 2012

जागृतीचा एक क्षण


आपण जन्मलो हे एक सत्य आहे आणि एक दिवस हे जग सोडून जाणार ज्याला मृत्यू म्हणतात ते एक सत्य आहे. ह्या दोन सत्य क्षणांना जोडणारी तुमची आयुष्य रेषा किती विविध घटनांनी एका चित्रपटाप्रमाणे
भरलेली असते ते सिंहावलोकन करतांना तुम्हाला नक्कीच जाणवेल. खूप वर्षापूर्वी मेल्यानन्तरच्या स्वर्गाची कल्पना दाखवून काही लोकांनी खूप लोकांना रिझविले परंतु काही जाणत्या माणसांनी मरणा
आधीच ह्या जन्मी ह्या देही स्वर्गीय सुख उपभोगायची व्यवस्था निर्माण केली. फक्त तिच्या पर्येंत पोहचण्यासाठी तुम्हाला हवा असतो जागृतीचा एक क्षण. जागृतीचा तो एक क्षण तुमचे आयुष्यच बदलवू शकतो.

ह्या जागृतीच्या एका क्षणाच्या वळणावर तुमच्या घडून गेलेल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतांना एक गोष्ट तुम्हाला मान्यच करावी लागते ती म्हणजे तुमच्या आयुष्यात पैश्याचे असणारे महत्व.
पैसा म्हणजे पाप तुमच्या अंतिम ध्येयात अडथळा निर्माण करणारे एक साधन असे सांगणारे तथा कथित गुरूंचे संपत्तीचे साम्राज्य तुम्ही बघितले तर त्याच्या विधानातील फोलपणा तुम्हाला नक्कीच कळेल.
पण ह्याचा अर्थ पैसा म्हणजेच सर्वस्व असाही होत नाही म्हणून तर म्हटले आहे.

"कहते हैं पैसा खुदा तो नहीं हैं
मगर खुदासे से कम भी नहीं हैं"

थोडक्यात तुमच्या त्या इच्छित स्वर्गीय सुखापार्येंत पोहचण्याचे पैसा एक साधन नक्कीच होऊ शकते.फक्त पैश्या सोबत तुम्हाला हवा असतो समंजसपणा आणि व्यवहार ज्ञान.
समंजसपणा आणि व्यवहार ज्ञान गुण आत्मसात करायला आयुष्यातील बरेच उन्हाळे पावसाळे खर्च करावे लागतात म्हणून तर कोणीतरी अनुभवाचे बोल म्हटले आहे.

"Real life starts after 40"
४० हा एक सामायिक नंबर म्हणता येईल. व्यक्ती आणि त्याचा आयुष्यरेषेनुसार त्याचे स्थान बदलू शकते. पण अश्या भावनेच्या जागृतीलाच आयुष्यातील तो एक जागृत क्षण म्हणता येईल आणि ज्याने त्याने तो आप आपला ठरवायचा असतो किंवा न ठरवताही आयुष्य जगता येतेच .

"You only live once but if you live it right once is enough"
"तुम्ही आयष्य एकदाच जगतात पण ते योग्य पद्धतीने जगलात तर एकदाच मिळालेले हे आयुष्यही पुरेसे असते "


आपण योग्य पद्धतीने आयुष्य जगतो आहे का हे तुम्ही तुमच्या 3 गोष्टी तपासून ठरवु शकतात
१)तुम्हाला तुमचे ८ तासाचे काम आवडते काय?
२)काम केल्यानंतर तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी तुमच्याजवळ पुरेसा वेळ आहे का?
३)तुमच्या जवळ स्वकष्टाचा तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा आहे का?

फक्त पुरेसा पैसा आणि गरजा मोजण्यासाठी स्वतःचे योग्य माप वापरा!
दुसऱ्याच्या मापाने तुमचे गणित सोडवू नका!

जर उत्तर नाही असेल तर पुन्हा प्रयत्न करा...
आणि तूमच्या जवळ कामच नसेल तर मत देण्यापूर्वी ३ वेळा विचार करा..
3 things to cross check if we are enjoying GOOD LIFE...
1)Are you enjoying your 8 hr work?
2)Do you have enough time to spend with your family and friends?
3)Do you have hard earned ENOUGH MONEY to fulfill all your REQUIREMENTS?

Just use the right units for ENOUGH MONEY and REQUIREMENTS and answer will return TRUE to you...

Don't use other's UNIT to solve your math.
If answer is false try hard and re-analyze your requirements..

If you don’t have work then think thrice while voting....


















आत्मपरीक्षण एक चिंतन








Saturday, September 1, 2012

Guide..The movie

गाईड हा माझा all time favorite चित्रपट आहे .R.K. Narayanan ह्यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा . खास करून नवीन पिढीने जुन्या पिढीतील हा चित्रपट न बघणारा विरळाच . मानवी आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ उताराचे अतिशय सुंदर चित्रण ह्या चित्रपटाद्वारे बघायला मिळते . मनाला पडणारे प्रश्न देव आहे का नाही ,श्रद्धा असावी का नसावी ह्याचे समर्पक उत्तर तुम्हाला ह्या चित्रपटात बघायला मिळेल .

सरळ मार्गाने जीवन जगणारा राजू गाईडच्या आयुष्यात अपघाताने लग्न झालेली रोजी येते .रोजी एका श्रीमंत म्हाताऱ्या archaeologist मार्को ची पत्नी असते .आपल्या शोध कार्यात मग्न असणाऱ्या मार्कोला रोजी
कडे लक्ष द्यायला वेळ नसतो .

रोजी एका वेश्येची सुंदर मुलगी असते आणि आपल्या मुलीने ह्या
वेश्या व्यवसायात राहू नये म्हणून तिच्या आईने तडजोड स्वीकारून हे लग्न जुळवलेले असते .

रोजीला नृत्याची खूप आवड आहे ह्याची जाणीव राजू गाईडला एकदा फिरत असतांना उत्स्फूर्त पणे रोजीने केलेल्या नृत्यावरून येते .



एकदा रोजी मार्को च्या दुर्लक्षित स्वभावाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते पण राजू गाईड एक मित्र म्हणून तिला सावरतो आणि तिच्या हक्काची जाणीव करून देतो .परंतु रोजीला जेव्हा मार्कोच्या बाहेरख्याली पणाची जाणीव होते तेव्हा ती त्याला सोडून सरळ राजू गाईडच्या घरी येते . पण मध्यम वर्गीय राजू गाईडचे घर सामाजिक दबावा मुळे तुटते . राजू गाईडचा मामा आईला घेऊन निघून जातो .हा धक्का सहन करून राजू गाईड रोजी बरोबर नवीन प्रवास सुरु करतो . तिच्या अंगात असलेल्या नृत्याच्या कलागुणांना त्याचे मार्केटिंग गुण वापरून तो एका प्रतिष्ठित उंचीवर पोहोचवतो .




परंतु पैश्या सोबत मित्राच्या संगतीमुळे दारू आणि जुगाराचे राजू गाईडला लागलेले व्यसन दोघांमध्ये थोडा दुरावा निर्माण करते .
दिल के मेरे पास हो इतने
फिर भी हो  कितनी दूर
तुम मुझसे में दिल  से परेशान
दोनों है मजबूर
ऐसे में किसको कौन मनाये
दिन ढल जाए हाय रात न जाए
तू तो  न  आये तेरी याद सताए




अश्या मनस्थितीत मार्को कडून आलेली दागिन्याची भेट जी तिच्या सहीमुळे तिला मिळणार असते ,राजू गाईडला अस्वस्थ (insecure) करते . परंतु मार्कोच्या ह्या भेट वस्तूची कल्पना रोजीला नसते .
रोजीला मार्कोची परत आठवण होऊ नये म्हणून in-secured राजू गाईड रोजीची खोटी सही कागदपत्रांवर करतो आणि फसतो . त्याला जेलमध्ये जावे लागते आणि रोजीच्या नजरेतून तो पूर्णपणे उतरतो .
त्यावेळेस त्याने म्हटलेला dialogue खूपचं छान आहे .


रोजी  समज़ रहा था दुनिया समजे न समज़े पर रोजी जरुर समज जाएगी पर हाय ये समज भी कितनी नासमज़ निकली"

"चलो सुहाना भरम तो टूटा जाना के हुस्न क्या हैं
कहती हैं जिस को प्यार दुनिया क्या चीज क्या बला हैं "



जेल मधून बाहेर आल्या नंतर कुठे जावे ह्या संभ्रमात राजू गाईड एका गावात येवून पोहचतो आणि एका मंदिरात राहायला लागतो . खूप अनुभवी आणि शिक्षित असलेल्या राजू गाईडच्या विवेकी कथा ऐकून गावकरी त्याला महात्मा समजू लागतात आणि एके वर्षी त्या गावावर दुष्काळाचे सावट येते ....
अश्या दुष्काळ ग्रस्थ परिस्थितीत एका गावकरयाच्या गैरसमजुतीतून राजू गाईड पाउस पडे पर्येंत आमरण उपवास करणार आहे असा गैरसमज गावात पसरतो आणि त्यांच्या अंध श्रद्धे पुढे झुकून राजू गाईडला उपवासाला बसावे लागते 


राजू गाईडच्या ह्या उपवासाची गोष्ट गावोगाव पसरते आणि असंख्य लोक ह्या महात्म्याच्या दर्शन साठी गर्दी करू लागतात आणि तेथे त्याची सोडून गेलेली आई आणि रोजी पण येते . त्यावेळेस त्याच्या मनातील द्वंद्व शब्दात वर्णन करणे अशक्य .....


Tuesday, August 28, 2012

eGovernance-संगणकीय शासन तुमच्या दारी..

काल डॉ . दीपक शिकारपूर यांच्या १९व्या पुस्तकाच्या अमेय प्रकाशनाच्या प्रकाशन सोहळाल्या उपस्थित राहण्याचा योग आला आणि त्या निमित्ताने डॉ. दीपक शिकारपूर ,मुख्य पाहुणे पद्मश्री विजय भाटकर , MKCL चे MD श्री विवेक सावंत आणि Former chief secretary of the state अजित निंबाळकर यांची व्याखाने ऐकण्याची संधी मिळाली. डॉ. दीपक शिकारपूर यांनी कॉम्पुटर आणि IT (Information Technology) ह्याबद्दलची बहुमूल्य माहिती महाराष्ट्रातील तळागाळातील व्यक्ती पर्येंत पोहचविण्याचे काम हि सर्व पुस्तके मराठीत लिहून समाजासाठी खरच खूप मोठे योगदान दिले आहे। हे पुस्तक eGovernance ह्या
क्षेत्रात रोजगाराच्या ,व्यवसायाच्या आणि career च्या विचारांना नक्कीच चालना देईल.





श्री विवेक सावंत यांचे भाषण म्हणजे एक "IT योग गुरु" बोलतो आहे असेच वाटते.eGovernance चा उपयोग जर माणुसकी हरवलेल्या शासनातील खऱ्या माणुसकीचा अनुभव सर्व सामान्याला जाणवेल ह्या साठी झाला तर तो खरा eGovernance चा उपयोग असेल हा विचार मनाला भिडला। सर्व सामान्य व्यक्तीने त्याच्या साठी असलेल्या सुविधा खेटे घालून मिळवण्या पेक्षा शासनच तुमच्या दारी येऊन तुमच्या हक्काची सुविधा तुम्हाला देईल ते खरे शासन।
Former chief secretary of the state अजित निंबाळकर ह्यांनी शासन आणि Computer ह्या बद्दलचे त्यांचे प्रत्यक्ष अनुभव सांगितले. भारतात कॉम्पुटर आणि TV चा प्रवेश कसा झाला ह्या बद्दलची बरीच माहिती त्यांनी दिली.मुख्य पाहुणे पद्मश्री विजय भाटकर ह्यांचे झंझावती भाषण त्यांच्या प्रदिर्घ अनुभवाची आणि प्रचंड कार्याची झलक दाखवून गेले . जाता जाता ते सांगून गेलेत .

Right to Right Education and Right to Right Government
हा येणाऱ्या काळातील विकासाचा मंत्र असेल .

Saturday, August 25, 2012

जे आपण पेरतो तेच उगवते...

११ ऑगस्ट ला मुंबईत झालेली दंगल आणि त्यामुळे देश्याच्या सुरक्षते बद्दल निर्माण झालेले प्रश्न आणि त्याचे उत्तर येणारा काळच देईल. आपला देश तो ज्या कोणत्या परिस्थितीत आहे त्याला सर्वस्वी जबाबदार आपणच असतो. "जे आपण पेरतो तेच उगवते" त्यामुळे भविष्यात जर आपलाल्या हवा असणारा India ,भारत (आता नावावर वाद नको) हवा असेल तर त्याची बीजे वर्तमानातच पेरावी लागतील.

मला राजकारणातले काही जास्त कळत नाही आणि तो माझा प्रांतही नाही पण माझा भारतात जन्म झाल्या मुळे आता भारतवासी असल्या मुळे ह्या देशावर प्रेम करणे मी माझे कर्तव्य समजतो आणि त्या प्रश्च्यात ह्या देशाने पर्यायाने हा देश चालविणार्यांनी माझ्या बेसिक गरजा पूर्ण करव्यात अशी अपेक्षा करतो. रोटी ,कपडा मकान ह्या पेक्षा हि सर्वात महत्वाची असते ती सुरक्षा. ज्या साठीच देशाच्या सीमांची निर्मिती होवून देश निर्माण होतात आणि देश चालवण्यासाठी जे लोक कारणीभूत असतात त्याचीच ती जबाबदारी असते. फार पूर्वी एक रशियन प्रवासी भारत भ्रमण केल्यानंतर म्हणाला होता.

"माझा परमेश्वरावर विश्वास नाही पण भारत भ्रमण केल्यानंतर पटायला लागले परमेश्वर असलाच पाहिजे नाहीतर हा देश कसा चालला असता."

मी जेव्हाही सरकारी कामा साठी सरकारी खात्यात जायचो तेव्हा "राम भरोसे" अस्ताव्यस्थ पडलेल्या Files बघून मलाही तसाच प्रश्न पडायचा.पण आता IT (Information technology) मुळे बरेच काही बदलत चालले आहे. पण फक्त अस्ताव्यस्थ पडलेले Document Digital document करून खरे प्रश्न सुटणार आहेत का.
मुळातच फक्त मता साठी निर्माण झालेल्या खोट्या कागदपत्राचे देश सुरक्षेसाठी देश प्रेमापोटी जाती,धर्माच्या पलीकडे जाऊन फक्त देश हितासाठी खरे Audit करण्याचे धैर्य कोणी दाखवेल का?

भविष्यात भारत सुपर पावर बनेल का? ह्या प्रश्नावर कात्थ्याकुट करण्यापेक्षा माझ्या देशाला चांगले धडविण्यात माझा काही role असेल का ह्याचा प्रत्येकाने विचार केला तर आपण भविष्यात सुपर पावर नाही पण world politics मध्ये महत्वाचा role play करू ह्यात मला शंका वाटत नाही. मी तर ठरवले आहे तुम्ही पण ठरवा.


इतनी शक्ति हमें दे न दाता
मन का विश्वास कमजोर हो ना!
....
हम ना सोचे हमें क्या मिला हैं
हम ये सोचे किया क्या हैं अर्पण!









Wednesday, August 22, 2012

अमिताभ बच्चन..तसे घडले नसते तर...

अमिताभ बच्चन ने Facebook page सुरु केले आणि अपेक्षे प्रमाणे अभूतपूर्व likes आणि comments नि त्याचे स्वागत झाले. आणि अमिताभ star of the millennium आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मी अमिताभ चा Zanzeer पासून Fan आहे. त्याचा Trishul चित्रपट मी २५ पेक्षा जास्त वेळा बघितला आहे. नशीब Engineering ला Admission घेण्या आधी मी त्रिशूल बघितला नाही, नाहीतर मी Electronics ला Admission न घेता Civil Engineering ला Admission घेतली असती. सांगायचा उद्देश मी अमिताभचा आणि त्याच्या विजय भूमिकेचा एवढा चाहता होतो आणि अजूनही आहे.अमिताभला लंडनच्या Heathrow विमानतळावर जवळून बघायचा योग माझ्या नशिबी आला . तो दिवस २१-जानेवारी-२००१ होता.
 

आयुष्यात काही योगायोग फार चमत्कारिक असतात त्यापैकी  हा एक म्हणता येईल. मी २०-ऑक्टोबर-२००० ला अमेरिकाला निघालो त्या दिवशी अमिताभच्या KBC वर हर्षवर्धन नवाथे हा पहिला करोडपती झाला होता. आम्ही पाच लोक अमेरिकेला बरोबर निघालो होतो. माझी ती पहिलीच अमेरिका वारी होती. BOSTON विमानतळावर immigration officer ने का कुणास ठाऊक पण मला अडविले आणि चार प्रश्न जास्त विचारले शिवाय माझ्या passport वर एक दिवस आधीचा stamp मारला. इतरांपेक्षा आपलाल्या एक दिवस आधी अमेरिका सोडावी लागणार ह्याचे त्यवेळेस फार वाईट वाटले पण त्यामुळेच मी लंडन विमानतळावर अमिताभला भेटू शकलो. मग पटले  जे होते ते चांगल्यासाठीच होते. वाईट घडते त्यावेळेस वाईट वाटते पण नंतर लक्ष्यात येते तसे घडले नसते तर हा योग आलाच नसता...

Check my post on Amitabh Bachchan's Facebook wall...

http://www.facebook.com/AmitabhBachchan/posts/335732546519501?notif_t=like


अमिताभ आणि मुंबईच्या पावसाचे मनोहर दृश्य चित्रित केलेले एक अप्रतिम गाणे





Sunday, August 12, 2012

मर्यादेचे महत्व आणि कर्मयोग

तुम्हाला नेमून दिलेले काम चोखपणे पूर्ण करायचे ह्यालाच कर्मयोग म्हणतात. कर्मयोगाचे आणि मर्यादेचे महत्व तुम्हाला माणसांपेक्षा निसर्गाकडून जास्त चांगल्या पद्धतीने शिकता येईल. डोळे बंद करून क्षणभर सूर्यमालेचा विचार करा किंवा चांदण्या रात्रीत चमकणाऱ्या आकाशातील ताऱ्यांकडे बघून विचार करा किती करोडो वर्षापासून सूर्य आणि त्याच्या भोवती आपल्या नेमून दिलेल्या कक्षेत हे सर्व  ग्रह आणि तारे फिरत आहेत. विचार करा मंगळाला असे वाटले आता बस झाले सूर्याची दादागिरी आता मी BOSS माझ्या भोवती ह्यांनी फिरायला हवे तर काय होईल?


कर्मयोग म्हणजे जे आपले नेमून दिलेले काम आहे ते ते चोखपणे बजावणे . मी जेव्हा Engineering पूर्ण केल्या नंतर ICIM सारख्या त्या काळातील मोठ्या कंपनी मध्ये Management Trainee म्हणून Join झालो तेव्हा माझ्या पहिल्या BOSS ने मला एक गुरु मंत्र दिला होता . तो मंत्र म्हणजे नौकरीमध्ये  "धु म्हटले कि धुवायचे असते ..." पुढचे वाक्य सर्वांना माहित असेलच ते मी येथे लिहू शकत नाही :) तर थोडक्यात तुम्हाला नौकरी करायची असेल तर एक लक्षात ठेवायचे BOSS IS ALWAYS RIGHT. You should follow what you have been told to do . आणि तुमची फारच घुसमट होत असेल तर सरळ नौकरी सोडून दुसरी बघावी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करून तुम्हाला हवे तसे तुमचे विश्व तुम्ही निर्माण करावे. कोणामुळे कोणाचेही अडत नसते हे Universal Truth समजावून घेवून स्वतः बद्दल झालेल्या गोड गैरसमजांना आळा घालावा.

असे म्हणतात हे सर्व एका महास्फोटातून निर्माण झाले "the big big blast the reason I a'm alive..." 
आणि जे निर्माण होते ते कधी ना कधी संपते हे सुद्धा एक सत्य आहे.




काही काही गीतकार त्यांच्या गाण्यातून  खुप मोठे  सत्य सहज सांगून जातात आणि संगीता मूळे त्या भावना मनाला भिडतात असेच एक इंदीवर यांनी लिहिलेले आणि कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेले सफर ह्या चित्रपटातील अप्रतिम गाणे
ओ नदिया चले चले रे धारा चंदा चले चले रे तारा
तुज़को चलना होगा , तुज़को चलना होगा
जीवन कही भी ठहरता नहीं हैं
आंधी से तूफान से डरता नहीं हैं
तू न चलेगा तो चल देंगी राहें
मजिल को तरसेंगी तेरी निगाहें
तुज़को चलना होगा , तुज़को चलना होगा








Saturday, August 4, 2012

अग्निपरीक्षा पण कुणाची ?

टीम अण्णा ने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला पण आता अग्निपरीक्षा कोणाची ? मला विचाराल तर खरी अग्निपरीक्षा भारतीय जनतेची आहे. आपले खरोखर कल्याण कोण करणार? कुणावर विश्वास ठेवावा? एखादा काळजाला हात घालणारा नारा खरा कि सत्ता काबीज करण्याचा एक मार्ग हे ओळखावे लागणार आहे. ह्या पूर्वीही असे काळजाला हात घालणारे नारे जनतेला फसवून गेले आहेत 
तेव्हा परत परत तीच चूक करायची का हा विवेकी विर्णय घेण्याची जबाबदारी जनतेची आहे. म्हणून मी म्हणतो खरी अग्निपरीक्षा  जनतेची आहे.जनतेची अवस्था महाभारतातील अर्जुना सारखी झालेली आहे. आपल्याच लोकांनी आपल्यावरच युद्धाची वेळ आणावी हाच विषद योग असतो. अश्या वेळेस गरज असते कृष्णा सारख्या मित्राची. 
मला वाटले होते "India Against Corruption" हि भूमिका करेल पण त्यांनी रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला ,असो.
पण अजूनही आपल्या देशात कृष्णाची भूमिका करून अर्जुन रुपी जनतेला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या लोकांची कमी नाही. अशा समविचारी लोकांनी एकत्र येवून हि भूमिका करण्याची वेळ आलेली आहे.

एक वर्षापूर्वी  टीम अण्णांनी जनतेच्या मनातील  खदखदणारा मुद्दा चव्हाट्यावर आणून जनजागृती केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
पण "सगळे चोर आहेत"  "जनता मलिक आहे हे तर नौकर आहेत" अश्या विधानांची गरज नव्हती."जनता मलिक आहे हे तर नौकर आहेत" हे वाक्य म्हणजे आपल्या घरातील लहानग्याला अरे तू तर आपल्या घराचा BOSS आहेस असे सांगून समजाविण्या सारखे आहे.  सब भ्रष्टाचारी हैं सब चोर हैं असे  सर्व सामान्य विधान करून कसे चालेल.
आजही तुम्ही बघितले तर सर्व राजकीय पक्षांमध्ये एका पेक्षा एक बुद्धिमान आणि सामर्थवान नेते आहेत. त्या सगळ्यांना एकाच माळेचे मणी म्हणून कसे चालेल.  आपण म्हणतो आज परिवर्तनाची गरज आहे तर मग तुम्हाला वाल्ह्या वाटणारा नेता वाल्मिकी झाला तरी चालणारच आहे. नाही देशाचे भले फक्त माझ्या हातूनच झाले पाहिजे ह्या स्वार्थी  विचाराचा  त्याग झाला तर अनेक रखडलेले चांगले Project  पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. शेवटी आपल्याला आपला भारत महान झालेला बघायचा आहे आणि ते आपल्या सगळ्यांना मिळून बनवायचा आहे. स्वातंत्र्या पूर्वी आपला लढा परकीयांशी होता पण आता लढा आपल्याच लोकाशी आहे ह्याचे भान आपण ठेवावयास हवे.

Sunday, July 22, 2012

Something is missing....


मागच्या शनिवारी लिहिलेल्या ब्लॉग ला अपेक्षे पेक्षा जास्त वाचक मिळाले आणि त्या पैकी काही लोकांनी email पाठवून ISKO कल्पना आवडली आणि त्यांच्याही सहभागाची तयारी दाखवली त्याबद्दल धन्यवाद.
तर ISKO - In search of Knowledge and Opportunity" एक वेगळा प्रकल्प स्वतंत्र पद्धतीने राबविला जाईल परंतु ह्या ब्लॉग मध्ये मी फक्त माझे विचार माझे अनुभव लिहिणार आहेत.

विचार लिहायला मी काही खूप मोठी व्यक्ती नाही . एक साधारण मध्यम वर्गीय भारतीय आहे ज्याचे किमान स्वप्न चांगल्या पगाराची नौकरी , एक मनासारखे घर आणि घरी येण्याची ओढ वाटावी असे कुटुंब असते. तर आयुष्यात सगळ्याच मध्यम वर्गीय लोकां प्रमाणे आयुष्याशी झगडत मी साधारण हे स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी झालो.तरीही something is missing ह्या मनुष्य स्वभावाला मीही अपवाद नाहीच.

खर म्हणजे हि रिक्त पणाची भावनाच आपल्या प्रगतीला कारक असते. पण कोठे थांबावे हे कळले नाही तर हीच प्रगती अधोगतीत बदलायला वेळ लागत नाही. थोडक्यात आयुष्यात मोठे ध्येय गाठायचे तुमचे स्वप्न असेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शक्तीची कल्पना असणे जेवढे महत्वाचे असते तेवढेच महत्व तुमच्या मर्यादा ओळखण्यालाही असते. आणि त्या साठी ध्यान आणि ज्ञान हाच्या सारखा राजमार्ग नाही. खूप लोक ध्यान आणि आस्तिक ( जे परमेश्वर मानतात ते) ह्यात गल्लत करतात. ध्यान करायला आस्तिक वा नास्तिक असण्याची गरज नसते.

मी आस्तिक आहे पण माझे परमेश्वराशी मैत्रीचे नाते आहे. मी देवळातही जातो पण खूप मोठी रांग असेल तर बाहेरूनच नमस्कार करतो. मला माझेच नियम (ज्या मुळे दुसऱ्या कोणाचेही नुकसान होणार नाही ह्याची खबरदारी घेऊन) करायला आणि ते पाळायला आवडतात.

नियम  ह्यामधील जो "यम" आहे तो कधीच बदलत नसतो "नियम" मात्र कालानुरूप बदलत असतात. खरे बघितले तर नियम हे  समाज सुधारणे साठी  समाजातील लोकांच्या भल्या साठी असतात पण प्रत्येक  नियमात एक पळवाट  लपलेली असते किंवा त्याच नियमाचा उपयोग त्रास देण्यासाठी सुद्धा करता येतो.ते शोधून त्याचा दुरुपयोग करणे आणि नियम करणार्यांनी  त्याच्याकडे काना डोळा करून समर्थन करणे हे प्रकार जेव्हा समाजात वाढत जातात तेव्हा समाज व्यवस्था रसातळाला जाण्यास सुरुवात होते. तेव्हा समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने नियमातील यमाचा विचार करूनच नियम पाळावयास हवेत.नियम म्हणजे जे काळनुरूप बदलत जातात. नियमातील यम हा भाग त्रिकालाबाधित सत्य असतो आणि तसाच राहतो. ह्याचे भान समाजातील सर्व लोकांनी ठेवणे आवश्यक असते.  

तर आपण ध्यान ह्या विषयावर बोलत होतो. आयुष्यात वेग वेगळ्या प्रकारे ध्यान करण्याचे प्रकार सांगणारे अनेक गुरु तुम्हाला भेटतील. ध्यानाची कोणतीच पद्धत चांगली वा अधिक चांगली नसते. कोणत्याही पद्धतीचे ध्यान नियमित करणे महत्वाचे असते. मी सध्या माझ्या रोजच्या व्यायामात " कपालभाती" ह्या श्वसनावर आधारित योग पद्धतीचा वापर करतो. आणि ह्या साठी रामदेव बाबांचे शतशा आभार. त्यांनी हि योग पद्धती सर्व सामान्यापर्येंत पोहचवली .

रोजच्या व्यायामात वयानुसार Stretching, Strength , Yoga/Dhyan ह्या तीनही प्रकारांचे योग्य मिश्रण असणे चांगले असते. रोज किंवा दिवसांमध्ये विभागून तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात व्यायामाचे योग्य वेळापत्रक बनवून नियमित व्यायाम करायला हवा. तसेच आठवड्यातून एक किंवा दोन दिवस व्यायामाला सुटी हे सुद्धा तेवढेच महत्वाचे असते. ह्या तीनही व्यायाम प्रकाराचे उत्तम मिश्रण म्हणजे "सूर्यनमस्कार". रोज १२ ते xxx तुमच्या वयानुसार आणि मर्यादेनुसार "सूर्यनमस्कार" आणि "कपालभाती" म्हणजे सुवर्णमध्य !.कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फायदा आणि तुमच्या धावपळीच्या जीवनात व्यायामाला वेळ नाही ह्या समस्सेवर रामबाण उपाय.

आणि जर तुम्हाला नृत्याची (Dance) आवड असेल तर त्याच्या सारखा व्यायाम नाही. आजकाल तरुण वर्गाला ह्याची फार भुरळ आहे. पण एखादी Saturday Dance Night तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत घरातच करून बघा . आठवड्या भराचा कामाचा शीण तुमच्या आयुष्यात आलेली मरगळ एका क्षणात नाहीशी होईल.

असाच एक कुटुंब आणि मित्रांसमवेत केलेला ग्रुप डान्स


Our Group Dance Link



आयुष्यात काहीतरी कमी आहे something is missing ही  पोकळी भरण्या साठी आपल्या कक्षा वाढवाव्या लागतात. Internet आणि त्यावरील Facebook, twitter ,Blogging ही माध्यमे काही प्रमाणात हि पोकळी भरायला मदत करतात. पण ही फक्त संपर्क साधने आहेत. प्रत्यक्षात लोकांमध्ये मिसळून लोकांसाठी काम करून खऱ्या अर्थानं हि पोकळी भरून काढता येते. ही पोकळी भरून काढण्या साठी वेळात वेळ काढून आपल्या छंदाची जोपासना करणे एक मार्ग असू  शकतो. आणि समाजा  साठी काही करावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखाद्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेशी स्वतःला  जोडून घेऊ शकतात. शहरात राहणारे बहुतेक लोक हौसिंग सोसायटी मधे राहतात. तेव्हा सोसायटीच्या कमिटीवर जाऊन तुम्ही तुमच्या सोसायटीला अधिक सुंदर अधिक राहण्या योग्य बनू शकतात. तुमचे घर , तुमची सोसायटी , तुमचा परिसर अधिक सुंदर बनला तर तुमचा देश सुंदर बनेल. जशी प्रत्येक वस्तू अणू रेणूंनी बनलेली असते तसेच देश देशातील लोकांनी बनलेला असतो आणि लोकांवर त्याच्या घराचा आणि परिसराचा खूप प्रभाव पडत असतो. आज काल आपण भले आणि आपले घर भले असा लोकांचा दृष्टीकोन संकुचित होत चालला आहे  Internet आणि  Facebook मुळे तर घरातील व्यक्ती व्यक्ती  मधील संवाद दुरावला आहे. हे बरोबत नाही. तुम्ही तुमच्या विचारांच्या कक्षेला कर्मयोगाची जोड देऊन तुमची दूरदृष्टी वाढवायला हवी.  मला आयुष्यात दोन सोसायटीच्या कमिटीवर काम करण्याची संधी मिळाली. तो अनुभव म्हणजे एक स्वतंत्र ब्लॉग चा विषय होऊ शकतो पण मला खूप शिकायला मिळाले त्या साठी मी एक SRM - Society Relationship Management नावाचे Software विकसित केले आहे. तुमच्या सोसायटी साठी ते हवे असल्यास मला कळवा मी माझ्या परीने योग्य ती मदत नक्की करीन.