Monday, March 25, 2013

आणि वाल्याचा वाल्मिकी झाला ..


वाल्या आणि नारदमुनी ह्यांची कथा सर्वांना माहित असेल. वाल्याचा वाल्मिकी झाला आणि पुढे  रामायण त्यांनी लिहिले. नवीन पिढीला माहित नसेल तर आजच्या काळाला  अनुसरून ती गोष्ट सांगतो.

वाल्या अवैध मार्गाने (वाटसरूंना लुटून) पैसा मिळविणारा एक लुटारू होता.

आजही भ्रष्टाचार , लोकांची फसवणूक करून आणि कुवती पेक्षाकर्जाचा मोठा डोंगर डोक्यावर घेऊन वाटचाल करणारे अजागृत लोक  
तुम्हाला आजूबाजूला बरेच दिसतील. आरश्यासमोर उभे राहून विचार
केला तर आपणही त्यातले एक आहोत हे तुम्हालाही जाणवेल.

 त्याला सन्मार्गावर आणण्यासाठी नारदमुनींनी त्याला एक प्रश्न केला.

नारदमुनी: तू हे सर्व कश्या साठी करतो आहेस .

प्रत्येकाच्या आयुष्यात असा सद सद विवेक बुद्धी जागविणारा विचार येतच असतो.

वाल्या : माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी 

ज्या प्रमाणे वाल्या त्याच्या कृत्याचे समर्थन करण्यासाठी कुटुंबाचे कारण पुढे करतो तसेच आपण आपल्या कृत्याचे समर्थन करण्यासाठी अनेक कारणे देत असतो. त्यात कुटुंब हे एक प्रमुख  कारण असते.

नारदमुनी: पण जो मार्ग तू निवडला आहेस तो पापाचा मार्ग आहे त्या पापात तुझे कुटुंब सहभागी (share holder) होतील का त्यांना विचारून ये.

आणि वाल्याने  हा प्रश्न जेव्हा कुटुंबातील सर्व व्यक्तिना विचारला तेव्हा त्याच्या पापात सहभागी  होण्यासाठी सर्वांनी नकार दिला आणि वाल्याचे डोळे उघडले.

नवीन पिढी तर्कशुद्ध पद्धतीने विचार करणारी आहे . वरील कथेतील गणित सोडवितांना गृहीत धरलेला "पाप" हा भाग ते मान्य करणार नाही 

तुम्हाला "पाप" मान्य नसेल तर "कायदा" "नियम" "शिक्षा" शब्द वापरून बघा आणि त्याचीही भीती वाटत नसेल तर...

कहीतरी अक्षम्य चूक होत आहे समाज रसातळाला जात आहे हे जाणा आणि तुमचे विचार बदला आणि अश्या परिस्थितीला जबाबदार असणारे लोक बदला .

Friday, March 8, 2013

Happy Womens Day

३ प्रेरणा www (वा-वू-वे) नेहमीच जगावर राज्य करीत आल्या आहेत. आणि  बहुतेकवेळा  दोन्ही प्रेरणांच्या मध्यस्थानी असलेली प्रेरणाच दोन्ही साठी कारणीभूत असते.अशी हि प्रेरणा पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली वर्षानुवर्षे चूल आणि मुल ह्या मध्येच  बंदिस्त राहिली असे चित्र काही वर्षापूर्वीचा इतिहास बघितला तर लक्षात येईल.पण आता शहरात तरी हे चित्र बदलत चालले आहे. शहरात स्त्री आणि पुरुष ह्यांच्यातील विषमतेचे अंतर कमी कमी होत चालले आहे परंतु दूर गावा कडे खेड्यांमध्ये अजूनही हे अंतर खूप आहे. शिक्षण नसणे आणि त्यामुळे आर्थिक दृष्ट्या पुरुषांवरच अवलंबून रहायची स्थिती आणि महिले कडे बघण्याचा समाजाचा एकूणच दृष्टीकोन ह्या स्थितीला जबाबदार आहे.पण हळू हळू हि परिस्थिती बदलेल. 
वरील दोन करणाव्यतिरिक्त आणखी एक सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे स्त्री हीच स्त्रीच्या मार्गात जास्त अडथळा निर्माण करत असते आणि ते सर्व मला मिळाले नाही मग तुला तरी का मिळावयास हवे ह्याच भावनेतून निर्माण झालेले असते. आणि हि भावना माझ्या मते working women मध्ये कमी असते असे माझे मत आहे.थोडक्यात न आवडणाऱ्या कामात जास्त काळ घालवावा लागला कि महिला असो वा  पुरुष अश्या प्रकारच्या नकारात्मक भावना निर्माण होणारच हेच सत्य आहे.


"पुरुष म्हणजे शक्ती आणि स्त्री म्हणजे सहनशक्ती "असे चित्र 
"स्त्री म्हणजे शक्ती आणि पुरुष म्हणजे सहनशक्ती "
होउनये म्हणजे झाले.

आपण नेहमी देशाची प्रगती GDP growth rate बघून ठरवतो पण मला वाटते देशाची खरी प्रगती मोजायची असेल तर
Happy Family Index असे नवीन मोजमाप शोधायला हवे. आणि हि Happy Family Index वाढवायला सर्वात महत्वाची भूमिका स्त्रीच करू शकते. 

!!! महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा !!!