Tuesday, October 21, 2014

Happy Family Index




आपण नेहमी देशाची प्रगती GDP ( gross domestic product ) बघून ठरवतो पण मला वाटते देशाची खरी प्रगती मोजायची असेल तर (Happy Family Index असे नवीन मोजमाप शोधावयास  हवे. 
देश तुमच्यासाठी काय करतो ह्या पेक्षा तुम्ही देशासाठी काय करता असा विचार करून बघा.आणि मग तुम्ही ज्या कुटुंबाचा हिस्सा आहात त्या कुटुंबाने तुम्हाला काय दिले आणि ते सुखी करण्या साठी तुम्ही काय केले असापण विचार करून बघा.
बऱ्याच गोष्टी आपण गृहीत धरतो आणि तिथेच आपण फसतो किंवा स्वतःची फसवणूक करून घेतो. 
एक सुखी कुटुंब निर्माण करणे हि पण एक प्रकारे देशसेवाच आहे.

अतिरेकी हे बहूतांशी सुखी कुटुंबाच्या अभावामुळे निर्माण झालेले असतात.
तेव्हा प्रत्येकाने जर एक सुखी कुटुंब निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न केलेत तर एका प्रगत पण संपूर्ण देश्याच्या दिशेने आपण नक्कीच पहिल्या स्थानावर लवकर पोहचू शकतो.
उत्तम राष्ट्रासाठी उत्तम नागरिकांची गरज असते.उत्तम नागरिक हे चांगल्या कुटुंबातून येतात.
सुखी कुटुंब निर्माण करण्यासाठी माणुसकीची मुल्ले जपावी लागतात.
माणुसकीच्या मुल्यांवर आधारित भारताने केलेली प्रगती नक्कीच उजवी ठरेल असा माझा विश्वास आहे. 
एका सुखी कुटुंबाच्या निर्मिती साठी प्रयत्न करून तर बघा वाटते तितके हे सोपे काम नाही.
प्रेम,जिव्हाळा,अनुकंपा आणि दयाळूपणा ह्या गुणांनी कुटुंब बांधले जाते.
कौटुंबिक मुल्ले समजून घेण्यासाठी खालील चार तत्वे विचारात घेतली जातात

१)एक स्त्री व एक पुरुष यामध्ये कधीही न तुटणारा बंध म्हणून विवाहाला पाठींबा.
सद्य परिस्थिती: वाढते घटस्फोटाचे प्रमाण चिंतेचा विषय. 

२)कुटुंब संस्थेमध्ये नवरा हा कुटुंब प्रमुख आणि बायको हि कुटुंब उभारणी करणारी कार्यकर्ती

सद्य परिस्थिती: दोघांनी क्षमता ओळखून स्वताहून जबाबदारी स्वीकारावी आणि दुसर्याने त्याला योग्य तो सहयोग मानापमानाचा विचार न करिता द्यावा हि काळाची गरज.

३)मुलांचे शिक्षण त्यांच्यावर होणारे संस्कार आणि शिस्त हि आई वडिलांची जबाबदारी.

सद्य परिस्थिती: इंटरनेटमुळे नको त्या वयात नको ती माहिती आणि संस्कार ह्याची भीती त्यामुळे आई वडिलांची जबाबदारी आणखीन वाढली आहे.

४)कुटुंबातील वृद्धांची जबाबदारी स्वीकारणे आणि इतर नाते संबंधांबरोबर सुसंवाद साधणे.

सद्य परिस्थिती: वेळेचा अभाव. सोप्या जीवन शैलीचा अभाव आणि उगाच न पेलवणाऱ्या उद्दिष्टांची कास निर्माण करते स्वकीयांपासून दुरावा.

थोडक्यात सुखी कुटुंब निर्माण करणे सोपे नाही.
मर्यादेचे महत्व ओळखून स्वत:वर प्रेम करितांना दुसऱ्याचाही विचार करायला जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण समंजस आणि सुसंस्कृत होण्याचा दिशेने वाटचाल करतो.अश्या व्यक्ती जेव्हा घरा-घरात ,
समाजात आणि पर्यायाने देशात वाढायला सुरुवात होते तेव्हा त्या घराची त्या समाजाची पर्यायाने त्या देशाची खरी प्रगती होते. 
स्वत:वर प्रेम करणे जेवढे योग्य असते तेवढेच त्याचे अहंकारात रुपांतरीत न होऊ देणे आणि दुसऱ्याचा विचार करितांना स्वतःवर अन्याय होऊ न देणेही तेवढेच महत्वाचे असते.
आणि हि Balancing Act तुमची तुम्हालाच आत्मसात करायची असते. येथे Copy & paste चालत नाही.

आजकाल वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली कौटुंबिक मुल्यांचा नाश होतो आहे.प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते तशीच सुखाची किंमत त्याग असते.फक्त तुमची सुखाची कल्पना आणि त्याग दोघेही वास्तव असावयास हवेत.
सुंदर सकाळ आणि पक्षांचा किलबिलाट अनुभवायचा असेल तर
उन्हे येई पर्येंत अंथरुणात लोळत पडण्याच्या तुमच्या आनंदाचा त्याग तुम्हाला करावाच लागतो.

तुम्ही एका सक्षम सुखी कुटुंबाची निर्मिती केली आहे असा तुमचा विश्वास असेल तर मग तुमच्या कुटुंबाच्या सभासदांची कक्षा वाढवून बघा.
तुमच्या कुटुंबासाठी काम करणारा वर्ग तो पण तुमच्याच कुटुंबाचा हिस्सा आहे हा विचार करून बघा.
तुम्ही एखादी कंपनी चालवीत असाल किंवा एखादया संस्थेवर काम करीत असाल तर ते पण तुमचे कुटुंबच आहे असा विचार करून ते पण सुखी करण्या साठी प्रयत्न करून बघा.
तुमच्याच सुखात भर पडेल.

भ्रष्टाचार मुक्त भारत अशी आपण कल्पना करतो पण दान ज्याला आपण नवीन भाषेत tip म्हणतो ती देण्याची वृत्ती पण जोपावयास हवी.
आपण tip फक्त अलिशान हॉटेलवर वायफळ खर्च केल्यानंतर देतो. पण कुणी कष्टकरी चांगले काम किंवा सेवा करितांना दिसला तर त्याला उत्स्फुर्तपणे tip द्यावी हि वृत्ती आपल्यात नाही
ती जोपासण्याची गरज आहे. करून बघा नक्कीच आनंद मिळेल.
घेण्या पेक्षा देण्यात जास्त आनंद आहे फक्त जे द्याल ते तुमच्या स्व अर्जित कष्टाचे असावयास हवे.


Saturday, May 3, 2014

After all we are Family.

JEE चा निकाल लागला. 

ज्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले त्यांचे अभिनंदन.
ज्या मुलांना अपेक्षे पेक्षा कमी मार्क्स मिळाले त्यांना आणि त्यांच्या पालकांना एकच सांगावेसे वाटते. तुमच्या मुलाला सांभाळून घ्यायची हीच वेळ आहे.
JEE चे मार्क्स हे एकमेव तुमच्या मुलाचे गुण आणि यश ठरविणारे मापक असू शकत नाही. हि पद्धत ह्या वर्षी पहिल्यांदाच मुलांवर लादण्यात आली आणि ती अंगवळणी पडायला वेळ लागेल किंवा ह्या वर्षीच्या मुलांना बळीचा बकरा करून पुढच्या वर्षी वेगळीच पद्धत अवलंबली जाईल. असो.
तेव्हा हीच ती वेळ असते मुलांना सांभाळून घ्यायची त्यांना योग्य तो आधार द्यायची. मुलाला चांगले मार्क्स मिळाले कि आपण अभिमाने सर्वांना सागतो आणि त्या साठी पालक म्हणून काय काय केले ते सर्वांना सागतो तसेच कमी मार्क्स मिळाले असतील तर ते पालकांचेही अपयश असते ते समजून घ्यावे आणि आपल्या पाल्याला समजून घ्यावे
ह्यालाच Family म्हणतात. After all we are Family.
Njoy the situational songs from kabhi ha kabhi na



फुरसत मिली न तुम्हे अपने जहां  से 
उसके भी दिल कि कभी समज़ते कहासे  !
जाना है जिसे फत्तर हीरा है वोह तो हीरा 
सदा तुमने एब देख हुनर को न जाना  !



My Posts

Mentor , गुरु आणि Friend

Wednesday, April 30, 2014

सुखी होण्याचा मंत्र-How to be Happy in any job


1. परिणामा पेक्षा, प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा. 
2. जे काम कराल त्यात जीव ओता आणि उत्कटता आतून जाणवू द्या, 
3. 'चांगले' किंवा 'वाईट.' असे घटनांना लेबलिंग करायचे थांबवा  
4. आपण एक भूमिका बजावीत अहो हे जाणून काम करा. 
5. घडलेल्या घटनेत अडकून बसण्या पेक्षा सोडून द्यायला शिका.

How to be happy 

1. Start focusing on the process, rather than the outcome.
2. Realize that passion comes from you, not from your job
3. Stop labeling events as ‘good’ or ‘bad.’
4. Realize that you are playing a role.
5. Know how to let things go.




नीट विचार केला तर तुम्हाला जाणवेल ह्या विचारांचा एकूण सार म्हणजेच "गीता सार"


"गीता सार"
"Karmanye Vadhikaraste, Ma phaleshou kada chana,
Ma Karma Phala Hetur Bhurmatey Sangostva Akarmani"
"

कर्म पर ही तुम्हारा अधिकार हैं! कर्मोंका का फल तुम्हारा उद्देश्य नहीं होना चाहिए
और ऐसाभी न हो कर्म न करनेके प्रति तुम्हारी आसक्ति बढे!
जो हुआ, वह अच्छा हुआ, जो हो रहा है, वहअच्छा हो रहा है, जो होगा, वह भी अच्छा हीहोगा।
तुम्हारा क्या गया, जो तुम रोते हो? तुम क्यालाए थे, जो तुमने खो दिया? तुमने क्या पैदाकिया था, जो नाश हो गया? 
जो लिया यहीं से लिया। जो दिया, यहींपर दिया।


"वरील विचार तुम्हाला मान्य नसतील आणि तुमचा Process अथवा system लाच विरोध असेल तर तुम्ही Top management मध्ये जाऊन Process अथवा System बदलण्याचा प्रयत्न करावयास हवा.
परंतु त्या साठी लागतात अविरत कर्म अपरिमित कष्ट. ते करण्याची तयारी न दाखवता फक्त टीका तुमच्या समस्येचे समाधान होऊ शकत नाही."


गीता - आशावादी विचार 


Acceptance & Negation of life

गीता 5 हजार वर्षापूर्वी एक आशावादी विचार देऊन गेली जो आज पर्येंत टिकून आहे.परंतु त्यानंतर २५०० वर्षानंतर गौतम बुद्धांनी विचार करायला लावणारा एक विचार दिला, तो जीवनातील निराशावाद दर्शवितो. आशा आणि निराशा एकाच जीवनाच्या दोन बाजू आहेत. काय वाईट काय चांगले असे एकदम judgmental होउन आपण निर्णय घेऊ शकत नाही.
विमानाचा शोध एका आशावादी विचाराचा विजय.
हवाई छत्री Plane Parachutes एका निराशावादातून जन्मलेला शोध.
पण दोघांचाही उपयोग महत्वाचा.


मत करो विश्वास उसपर जो परंपरा से पास आया हैं!
मत करो विश्वास केवल इसलिए की गुरु ने बताया हैं!
स्वयंम ही परीक्षण करो निरिक्षण करो!
फिर पाओ जो विचार कल्याण का सब प्राणियोंका
तो जुड़कर रहो उससे!
वही होगा पथप्रदर्शक!
क्यूंकि वोह विचार होगा स्वनिर्मित..!
इसलिए होगा सुनिश्चित!

--गौतम बुद्ध!



Appreciation - कौतुक..!!!

मला आयुष्यात Business ,Job आणि सहकारात काम करण्याची संधी मिळाली. माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. मी आनंदाचे क्षण तेव्हा अनुभवतो जेव्हा मला एखाद्या creative प्रोजेक्टवर काम करायला मिळते आणि ते पूर्ण केल्या नंतर manager आणि users कडून
जेव्हा Appreciation होते तो दिवस तो क्षण माझा आनंदाचा असतो.

Job satisfaction is directly proportional to the Appreciation.
Do not confuse appreciation with your salary or money gain. तुम्ही आजूबाजूला बघाल तर तुमच्या लक्षात येईल.

खूप मोठा पगार असूनही
No job satisfaction. 
खूप पैसा आहे (Businessman, Politician, Actors)
But no job satisfaction if appreciation is missing

थोडक्यात 

Choose a job you love and select a life partner who loves you!

सांगायला सोपे आहे पण आयुष्यात असा योग जुळवून आणण्यासाठी करावे लागतात प्रयत्न.

खूप पैसा मिळवल्यानंतर मतांचे Appreciation मागण्यापेक्षा समाजासाठी देशासाठी खरी development ची कामे करा मतांचे Appreciation manage करावे लागणार नाही आणि खरे job satisfaction म्हणजे काय हे नेत्यांना सुद्धा अनुभवता येईल.

"Remembering that you are going to die is the best way I know to avoid the trap of thinking you have something to lose. You are already naked. There is no reason not to follow your heart."
-Steve Jobs

"चुका तर मानव जन्म घेतल्या नंतर देव चुकवू शकले नाहीत; आपण तर सर्व सामान्य माणसे आहोत"
This should be remembered to overcome any kind of failure.

One of the best comment on my blog post. 
Thanks very much unknown friend for this comment ...😊



Checklist of Good Habits worth to be consider to enjoy happy Life

1. Start your day with early morning - Wake up  before 6 AM.  5 AM is the best Time
2. Follow Good Food Habits - Dinner around 7 PM is best then plan the rest accordingly
3. Control quantity and Quality of food intake. 





                                                                 My Posts

                       


Wednesday, April 9, 2014

EMC- Educational Middle Class



EMC-  Educational Middle Class 

असा क्लास असतो? 
नीट  विचार केला तर असा क्लास होता आहे आणि राहील . काही कारणास्तव बहुतांशी नको त्या आकर्षणामुळे ऐन बारावीत अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन बौद्धिक क्षमता असूनही ह्या क्लास मध्ये बसायची  वेळ बर्याच विद्यार्थ्यांवर येते . गुणांच्या जोरावर चांगल्या विद्यालयात मिळालेला प्रवेश किंवा  Campus Interview द्वारे मिळणारी नौकरीची संधी जेव्हा हुकते तेव्हा मनाला वाटणारी रुख रुख फक्त ह्या वर्गातील मुलेच समजू शकतात . मी पण ते समजू शकतो कारण मी पण त्याच वर्गातील विद्यार्थी होतो. 

आयुष्याला वळण देणारे अभ्यासाचे  बारावीचे वर्ष आणि लहानही नाही आणि मोठेही नाही अशी त्रिशंकू अवस्था एकाच वेळी का ?  अश्या  अनेक 'का ' पैकी एक ऊतर नसलेला  प्रश्न .

बारावी नंतर महाविद्यालयात प्रवेश मिळवणे एक दुसरे महादिव्य असते. आणि ह्या महविद्यालयात आल्यानंतर काही विध्यार्थी उपरती झाल्यामुळे अचानक सुधारतात आणि अभ्यासाला लागून हा   EMC class सोडून वरच्या   class ला जातात,  तर वरच्या   class  मधील काही विध्यार्थी ह्या class मध्ये प्रवेश घेतात आणि ह्या  EMC चे अस्तित्व टिकवून ठेवतात . 

Campus Interview मधून नौकरीची संधी फार थोड्यांना मिळते.  त्यातही हवी असलेली नौकरी मिळणारे फारच थोडे नशीबवान असतात . मग उरलेलेया बाकीच्यांचे काय?

हातातील डिग्री आणि हवी असलेली नौकरी मिळवण्यासाठी काय करावे?

उत्तर आहे

Decide what you want to do in life and  learn and add  respective skills to your resume.

आयुष्याचे तुमचे धेय्य निश्चित करा आणि त्यानुसार योग्य ती कौशल्ये  आत्मसात करा आणि  तुमचा बायो डाटा अद्यावत करा .

पण आयुष्यभर नौकरीच करायची का स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा हा सुद्धा तुमच्या विचाराचा एक भाग असू द्या? पण काही अनुभव नसतांना एकदम व्यवसायात उडी मारण्या पेक्षा नौकरी द्वारे थोडा अनुभव घेऊन व्यवसायात उतरणे फायद्याचे ठरू शकते.  मी हे सांगू शकतो कारण मी आयुष्यात असे बरेच उलटे सुलटे प्रयोग करून बघितले आहेत. फक्त एक लक्षात ठेवा नौकरी करून तुम्ही फक्त तुमचे कुटुंब पोसू शकतात पण उत्तम व्यवसाय करून तुम्ही काही लोकांसाठी नौकरी च्या संधी उपलब्ध करू शकतात . 

मी इंजिनियरिंग इलेक्ट्रोनिक्स मध्ये केले पण त्यवेळेस आमच्या  syllabus मध्ये  Computer हा शब्दही नव्हता . पण माझे अतापार्येन्तचे सर्व आयुष्य  Computer & IT ह्या क्षेत्रात काम करण्यात गेले. 


I am self learner & learned respective skills demanded by the industry at that respective time.


Microprocessor 8085,Main frame computer, 

Card reader, PC, Laptop,Cobol, Basic,C,VB, VB.NET,ASP.NET,Java,Java Script, HTML, Web Development, SQL,Database Application development,Cloud Computing,CRM, ERP,  BI and now the buzzword Bigdata.
असा माझा प्रवास झाला.  

IT क्षेत्रात काम करावयाचे असेल तर सतत शिकत राहावे लागते 


But I Enjoyed It. तुमच्या आवडीचे काम असेल तर नवीन गोष्टी शिकण्यात मन रमते .

पैसा मिळवणे हा तर आपला नौकरी किंवा व्यवसाय ह्या मागचा  प्रमुख उद्देश असतो  पण आपल्या आवडीचे काम असेल तर  Life बन जाती हैं !

सद्ध्या कामातून वेळ काढून, नौकरीच्या शोधात असलेल्या
  विद्यार्थ्यांसाठी Skill Development Classes सुरु करावेत असा विचार मनात सुरु आहे.  

So watch out for my new Technical Skill Development blog! 

It will be online e Learning Class.
Special consideration for EMC class student....:)

And remember Knowledge is POWER..

Knowledge is POWER to survive in 21st century and it is easily available due to grace of IT - India Talent/Information Technology. 







Saturday, February 15, 2014

भारत भाग्य विधाता म्हणजेच जनता


अरविंद केजरीवाल ह्यांनी शेवटी सरकार चालविण्याच्या जबाबदारीतून स्वतःची सुटका करून घेतली.सरकार  काय किंवा एखादी कंपनी काय किंवा सगळ्यात छोटी संस्था म्हणजे घर चालविणे हि एक जबाबदारी असते आणि त्या साठी खूप कसरत करावी लागते.
अशी बरीच उदाहरणे आहेत जेथे शिक्षणात अव्वल असलेले विद्यार्थी पुढे शिक्षणात फारशी चमक न दाखविणाऱ्या विद्यार्थ्याच्या कंपनी मध्ये नौकरी करितांना दिसतात.व्यवहारी जगाची गणितच वेगळी असतात. अरविंद केजरीवाल म्हणजे आप ह्यांचे विचार नक्कीच चांगले आहेत पण त्यांचे प्रत्यक्ष्य उदाहरण अजून बघावयास मिळाले नाही.
ते कसे प्रत्यक्षात उतरावे हे त्यांनाच ठरवावे आणि करून दाखवावे लागेल. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यांनी चूक केली का प्रभावी राजकारण केले हे तर काळ म्हणजे भारत भाग्य विधाता 
म्हणजे जनताच ठरवेल. जनतेला विचारून सत्तेवर आलेले केजरीवाल राजीनामा देतांना जनतेला सोयीस्कर रित्या विसरले हे जनता विसरणार नाही. 
राजकारणाच्या बुद्धीपटावर उतरल्या नंतर जनतेला बनावट कल्पितांची आस दाखून खेळ कसा जिंकायचा हे प्रत्येक राजकारणी शिकतो. मला वाटते भारत भाग्यविधा म्हणजे जनतेने  राजकारणाच्या शुद्धी कारणासाठी आप पक्षाचा बागुलबुवा कायम विरोधी पक्ष म्हणून राजकारणात जिवंत ठेवावा. अरविंद केजरीवाल ह्यांना सुद्धा तोच रोल जास्त आवडतो हे त्यांनी  त्यांच्या ४९ दिवसाच्या राजकीय प्रवासात वेळोवेळी दाखून दिले.




एकंदरीत पूर्ण बहुमत मिळाल्या शिवाय आप कारभार करणार नाही आणि लोकसभेत त्यांना पूर्ण बहुमत मिळणार नाही हे उघड सत्य आहे.
त्यामुळे भारत भाग्यविधाता जनतेने २०१४ ला "दिल्लीत पूर्ण बहुमताने आप आणि केंद्रात पूर्ण बहुमताने नमो" असा प्रयोग करून बघावा. म्हणजे दुध का दुध और पानी का पानी २०१९ पर्येंत स्वच्छ होईल.

 बघूया काळाच्या उदरात काय लपले आहे ते.

Read this article It's not just corruption
Summary:
AAP doesn’t recognise how much absence of predictability and order also hurts the poor.



Friday, February 14, 2014

In search of Love...

प्रेमाचा शोध



खरे प्रेम अनुभवायला दुतर्फी प्रेमाची साथ लागते
एक तर्फी प्रेमाला त्यागाची गरज भासते

काळ हे प्रेमाच्या जखमेवर  औषध असते
भूतकाळातील वेदनांवर हास्याची किनार जोडते

दुतर्फी प्रेम एकतर्फी जाणवते जेव्हा
परिवर्तन हे एकच सत्य कळते तेव्हा

-संजीव चौधरी

प्रेम हा सर्व वयोगटातील व्यक्तींचा आवडता विषय आहे आणि त्याची कमी ते मिळाले तरी जाणवतच राहते.हे एक सत्य आहे.शाळेतील तुमच्या पहिल्या प्रेमाच्या भावना आणि त्यानंतर प्रेमाचे आलेले वेगवेगळे अनुभव तुम्ही तपासून बघितले तर तुमचे तुम्हालाच  जाणवेल परिवर्तन हाच जगाचा एकमेव नियम आहे.
कोणे एकेकाळी कोणावर असलेले तुमचे प्रेम काळाच्या ओघात कमी झालेले तुम्हाला जाणवेल आणि त्याची जागा दुसऱ्या ध्येयाने केव्हा घेतली हे तुम्हाला कळतही नसते. हे असे का होते.. खऱ्या  प्रेमाच्या शोधात आपण कोणाचा शोध घेत असतो. मी कुठेतरी ऐकले होते आयुष्यातील मार्गावर येणाऱ्या ह्या प्रेमाच्या पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला टप्या टप्याने त्याच्याकडे ओढत असतात. त्याच्याशिवाय तुम्ही कुणावरही खरे प्रेम करू शकत नाही . पण ह्याचा अर्थ टप्प्या टप्प्या ने तुमच्या आयुष्यात आलेले प्रेम खोटे असते का ?मला विचाराल  तर माझे उत्तर नाही असेल . खर म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारा प्रेमाचा टप्पा दु तर्फी असायलाच भाग्य  लागते. एकतर्फी प्रेमाचे  टप्पे तुम्हाला दिल का दर्द देवून जातात . मग तुम्हाला दर्द भरे गीत आवडायला लागतात. एका चे प्रेम दुसर्यावर दुसर्याचे तिसर्यावर हा प्रेमाचा त्रिकोण तर असंख्य चित्रपटांच्या निर्मितीचा प्राण असतो. आणि त्यात आपलीच कथा शोधून आपणच त्या चित्रपटाला Hit करतो.

प्रेमा बद्दल खलिल जिब्रान याने त्याच्या "Prophet" प्रेषित ह्या प्रसिद्ध पुस्तकात केलेले वर्णन अवर्णनीय आहे.


“When love beckons to you follow him, Though his ways are hard and steep. And when his wings enfold you yield to him, Though the sword hidden among his pinions may wound you. And when he speaks to you believe in him, Though his voice may shatter your dreams as the north wind lays waste the garden. For even as love crowns you so shall he crucify you. Even as he is for your growth so is he for your pruning. Even as he ascends to your height and caresses your tenderest branches that quiver in the sun, So shall he descend to your roots and shake them in their clinging to the earth......
But if in your fear you would seek only love's peace and love's pleasure, Then it is better for you that you cover your nakedness and pass out of love's threshing-floor, Into the seasonless world where you shall laugh, but not all of your laughter, and weep, but not all of your tears. Love gives naught but itself and takes naught but from itself.
Love possesses not nor would it be possessed; For love is sufficient unto love. And think not you can direct the course of love, if it finds you worthy, directs your course. Love has no other desire but to fulfil itself."
But if you love and must needs have desires, let these be your desires: To melt and be like a running brook that sings its melody to the night. To know the pain of too much tenderness. To be wounded by your own understanding of love; And to bleed willingly and joyfully.”
― Khalil Gibran, Le Prophète


जेव्हा प्रेम तुम्हाला खुणावून बोलाविल तेव्हा तुम्ही त्याच्या मागोमाग जा 
त्याचे मार्ग बिकट आणि उभ्या चढणीचे असले तरी !
आणि जेव्हा त्याचे पंख तुम्हाला आपल्या मिठीत घेतील तेव्हा तुम्ही त्याच्या स्वाधीन व्हा...
जरी त्याच्या पंखात लपलेली तलवार कदाचित तुम्हाला जखमी करणार असली तरी!


परमेश्वर आणि प्रेम ज्याने त्याने आपापले शोधायचे असते.
आणि जेव्हा तुम्हाला त्याची अनुभूती येते तेव्हा त्याची जाहिरात करायची नसते.जाहिरात करण्याची इच्छा अधर्माला जन्म देते आणि पुढे तोच अधर्म धर्म  नावाने  फोफावतो.





















Sunday, February 2, 2014

कर्मयोग आणि भारतीय राजकारण

गांधीना विरोध करणे हि तरुण पिढी मध्ये आपला वेगळेपणा सिद्ध करण्याची सोपी पद्धत कधी रूढ झाली ते मला माहित नाही , पण मी शाळेत असतांना कळत नसूनही सभोवतालील गांधी विरोधी विचार ऐकून मी पण गांधी विरुद्ध माझ्या आजोबांसमोर बोललो आणि आजोबा म्हणाले 

"गांधी वर मत द्यावे एवढे तुझे वयही नाही आणि अभ्यासही नाही. त्यांनी देशासाठी जे केले त्यात काही चुका झाल्या असतीलहि 
पण देशाला बरेच काही दिले हे सुद्धा एक सत्य आहे.तर त्याचा आदर करायला शिक. चुका तर मानव जन्म घेतल्या नंतर देव चुकवू शकले नाहीत; आपण तर सर्व सामान्य माणसे आहोत. "

अश्या माझ्या आजोबां सोबत महाभारतातील गोष्टी ऐकत माझे बालपण घडत गेले. माझ्या आजोबांनी मला नेहमी कर्मयोगाचे महत्व शिकवले. ते म्हणायचे

" तुमच्या वाट्याला जे आले आहे किवा तुम्ही जो व्यवसाय स्वीकारला आहे तो खऱ्या अर्थाने एक कर्मयोगी बनून तुम्ही पूर्ण केला पाहिजे. तुम्ही सैनिक असाल तर  शत्रूला मारणे तुमचे कर्तव्य आहे तेथे अहिंसे बद्दल विचार करून चालणार नाही. तुम्ही डॉक्टर असाल तर रोग्याला बरे करणे हे तुमचे कर्तव्य आहे. त्याच्यामुळे मला रोग झाला तर असा विचार करून
 तुम्हाला चालणार नाही. शिक्षक असाल तर खरे विद्यादान करणे तुमचे कर्तव्य आहे आणि राजकारणी असाल तर  खऱ्या अर्थाने जनतेच्या भल्यासाठी तुम्ही राजकारण करणे हेच तुमचे कर्तव्य आहे."

कर्मयोगाचे जिवंत उदाहरण बघायचे असेल तर तुम्ही तुमच्या घरात Furniture चे काम केले असेल तर ते काम करणारा राजस्थानी मिस्त्री आठून बघा . मी नेहमीच त्या लोकांच्या काम करायच्या पद्धतीने
भारावतो. कर्मयोगाचे जिवंत उदाहरण असते ते. आणि त्या कर्मायोगातून साकारते आर्किटेक्चर आणि तुमच्या स्वप्नातील घराचे सुंदर रूप.
आता त्या पाठोपाठ बिहार आणि युपीचे मिस्त्री सुद्धा तेवढेच खरे कर्मयोगाचे जिवंत उदाहरण म्हणून बघायला मिळतात.

कर्मयोगाचे आणि मर्यादेचे महत्व तुम्हाला निसर्गाकडून जास्त चांगल्या पद्धतीने शिकता येईल. डोळे बंद करून क्षणभर सूर्यमालेचा विचार करा किंवा चांदण्या रात्रीत चमकणाऱ्या आकाशातील ताऱ्यांकडे बघून विचार करा किती करोडो वर्षापासून सूर्य आणि त्याच्या भोवती आपल्या नेमून दिलेल्या कक्षेत हे सर्व  ग्रह आणि तारे फिरत आहेत.
विचार करा मंगळाला असे वाटले आता बस झाले सूर्याची दादागिरी आता मी BOSS माझ्या भोवती ह्यांनी फिरायला हवे तर काय होईल?



सध्या भारतीय राजकारणातील अनेक राजकीय ग्रहांना सूर्य (पंतप्रधान)  होण्याचे वेध लागले आहेत. बघू या कोण होते ते. मला राज कारणाचा जास्त अभ्यास नाही पण काही दिवसांपूर्वी वाचलेले मोदींच्या काल्पेनेतील भारत हे विचार आवडले.


चांगले विचार  हे चांगलेच असतात सत्तेवर कोणीही आले तरी त्यांनी ह्याचा पाठपुरावा करावयास हवा.
फक्त विरोधाला विरोध म्हणून चांगल्या विचारांना विरोध कोणी करू नये.

खैरात म्हणून मिळालेल्या पैश्या पेक्षा कर्मयोगाने कष्ट करून मिळविलेला पैसा श्रेष्ट ह्याची शिकवण आणि आठवण हि आपली खरी भारतीय संस्कृति आहे ह्याची जाण तळागाळा पर्येंत करून देण्याची गरज आहे आणि त्या साठी तश्या योजना आखण्याची खरी गरज आहे.

भ्रष्टाचार मिटवणे हे गरजेचे आहे पण त्यामागे विकासाचा मुद्दा मागे पडावयास नको ह्याची पण खबरदारी घेणे हीच काळाची आणि भारतीय राजकारणाची खरी गरज आहे.

भारतीय राजकारण आणि निवडणूक 2019



Friday, January 3, 2014

Balancing Your Life


मर्यादेचे महत्व ओळखून स्वत:वर प्रेम करितांना दुसऱ्याचाही विचार करायला जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण समंजस आणि सुसंस्कृत होण्याचा दिशेने वाटचाल करतो.अश्या व्यक्ती जेव्हा घरा-घरात , समाजात आणि पर्यायाने देशात वाढायला सुरुवात होते तेव्हा त्या घराची त्या समाजाची पर्यायाने त्या देशाची खरी प्रगती होते. स्वत:वर प्रेम करणे जेवढे योग्य असते तेवढेच त्याचे अहंकारात रुपांतरीत न होऊ देणे आणि दुसऱ्याचा विचार करितांना स्वतःवर अन्याय होऊ न देणेही तेवढेच महत्वाचे असते.आणि हि Balancing Act तुमची तुम्हालाच आत्मसात करायची असते. येथे Copy & paste चालत नाही.
हि Balancing Act शिकतांना दुसर्यांचे अनुभव , पुस्तक किंवा गुरु किंवा एखाद्या professional workshop मधून मिळालेले मार्गदर्शन नक्कीच तुमच्या कामी  येऊ शकते.


आयुष्याचे बरेच तत्वज्ञान काही गाण्यामधुनही तुम्हाला मिळू शकते. थोडक्यात reference तुम्ही अनेक मार्गांनी मिळवू शकतात पण तुमच्या आयुष्याला लागू पडणारी Balancing Act तुमची तुम्हालाच शोधायची असते.



Songs with Life Philosophy

Good Morning अभंग




  • मला आवडलेले काही विचार
  • "आप" - We the people
  • वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाही
  • Balancing Your Life

  • Your Health is your True Power
  • सूर्यनमस्कार- Suryanamaskar
  • EveryDay Exercise - एक प्रात्यक्षिक सुरुवात

  • मैत्रेय - The Friend
  • PSR - झाडे आणि मुले वाढ्वितांना
  • Mentor , गुरु आणि Friend
  • How to be happy in Any Job
  • PSR - झाडे आणि मुले वाढ्वितांना
  • जागृतीचा एक क्षण
  • शोध
  • आणि मी तिला सोडले आणि बरेच काही 
  • आत्मपरीक्षण - एक चिंतन
  • मर्यादेचे महत्व आणि कर्मयोग
  • चैत्र गुढी पाडवा सृष्टी निर्मितीचा दिवस
  • आणि वाल्याचा वाल्मिकी झाला 
  • Happy Family Index
  • My मराठी
  • Meet, Discuss and ask. पुछनेमे में क्या जाता है!
  • स्वदेश
  • FDP - Faculty Development Workshop
  • Learn Dandiya & Garba Steps