Saturday, February 15, 2014

भारत भाग्य विधाता म्हणजेच जनता


अरविंद केजरीवाल ह्यांनी शेवटी सरकार चालविण्याच्या जबाबदारीतून स्वतःची सुटका करून घेतली.सरकार  काय किंवा एखादी कंपनी काय किंवा सगळ्यात छोटी संस्था म्हणजे घर चालविणे हि एक जबाबदारी असते आणि त्या साठी खूप कसरत करावी लागते.
अशी बरीच उदाहरणे आहेत जेथे शिक्षणात अव्वल असलेले विद्यार्थी पुढे शिक्षणात फारशी चमक न दाखविणाऱ्या विद्यार्थ्याच्या कंपनी मध्ये नौकरी करितांना दिसतात.व्यवहारी जगाची गणितच वेगळी असतात. अरविंद केजरीवाल म्हणजे आप ह्यांचे विचार नक्कीच चांगले आहेत पण त्यांचे प्रत्यक्ष्य उदाहरण अजून बघावयास मिळाले नाही.
ते कसे प्रत्यक्षात उतरावे हे त्यांनाच ठरवावे आणि करून दाखवावे लागेल. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यांनी चूक केली का प्रभावी राजकारण केले हे तर काळ म्हणजे भारत भाग्य विधाता 
म्हणजे जनताच ठरवेल. जनतेला विचारून सत्तेवर आलेले केजरीवाल राजीनामा देतांना जनतेला सोयीस्कर रित्या विसरले हे जनता विसरणार नाही. 
राजकारणाच्या बुद्धीपटावर उतरल्या नंतर जनतेला बनावट कल्पितांची आस दाखून खेळ कसा जिंकायचा हे प्रत्येक राजकारणी शिकतो. मला वाटते भारत भाग्यविधा म्हणजे जनतेने  राजकारणाच्या शुद्धी कारणासाठी आप पक्षाचा बागुलबुवा कायम विरोधी पक्ष म्हणून राजकारणात जिवंत ठेवावा. अरविंद केजरीवाल ह्यांना सुद्धा तोच रोल जास्त आवडतो हे त्यांनी  त्यांच्या ४९ दिवसाच्या राजकीय प्रवासात वेळोवेळी दाखून दिले.




एकंदरीत पूर्ण बहुमत मिळाल्या शिवाय आप कारभार करणार नाही आणि लोकसभेत त्यांना पूर्ण बहुमत मिळणार नाही हे उघड सत्य आहे.
त्यामुळे भारत भाग्यविधाता जनतेने २०१४ ला "दिल्लीत पूर्ण बहुमताने आप आणि केंद्रात पूर्ण बहुमताने नमो" असा प्रयोग करून बघावा. म्हणजे दुध का दुध और पानी का पानी २०१९ पर्येंत स्वच्छ होईल.

 बघूया काळाच्या उदरात काय लपले आहे ते.

Read this article It's not just corruption
Summary:
AAP doesn’t recognise how much absence of predictability and order also hurts the poor.



Friday, February 14, 2014

In search of Love...

प्रेमाचा शोध



खरे प्रेम अनुभवायला दुतर्फी प्रेमाची साथ लागते
एक तर्फी प्रेमाला त्यागाची गरज भासते

काळ हे प्रेमाच्या जखमेवर  औषध असते
भूतकाळातील वेदनांवर हास्याची किनार जोडते

दुतर्फी प्रेम एकतर्फी जाणवते जेव्हा
परिवर्तन हे एकच सत्य कळते तेव्हा

-संजीव चौधरी

प्रेम हा सर्व वयोगटातील व्यक्तींचा आवडता विषय आहे आणि त्याची कमी ते मिळाले तरी जाणवतच राहते.हे एक सत्य आहे.शाळेतील तुमच्या पहिल्या प्रेमाच्या भावना आणि त्यानंतर प्रेमाचे आलेले वेगवेगळे अनुभव तुम्ही तपासून बघितले तर तुमचे तुम्हालाच  जाणवेल परिवर्तन हाच जगाचा एकमेव नियम आहे.
कोणे एकेकाळी कोणावर असलेले तुमचे प्रेम काळाच्या ओघात कमी झालेले तुम्हाला जाणवेल आणि त्याची जागा दुसऱ्या ध्येयाने केव्हा घेतली हे तुम्हाला कळतही नसते. हे असे का होते.. खऱ्या  प्रेमाच्या शोधात आपण कोणाचा शोध घेत असतो. मी कुठेतरी ऐकले होते आयुष्यातील मार्गावर येणाऱ्या ह्या प्रेमाच्या पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला टप्या टप्याने त्याच्याकडे ओढत असतात. त्याच्याशिवाय तुम्ही कुणावरही खरे प्रेम करू शकत नाही . पण ह्याचा अर्थ टप्प्या टप्प्या ने तुमच्या आयुष्यात आलेले प्रेम खोटे असते का ?मला विचाराल  तर माझे उत्तर नाही असेल . खर म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारा प्रेमाचा टप्पा दु तर्फी असायलाच भाग्य  लागते. एकतर्फी प्रेमाचे  टप्पे तुम्हाला दिल का दर्द देवून जातात . मग तुम्हाला दर्द भरे गीत आवडायला लागतात. एका चे प्रेम दुसर्यावर दुसर्याचे तिसर्यावर हा प्रेमाचा त्रिकोण तर असंख्य चित्रपटांच्या निर्मितीचा प्राण असतो. आणि त्यात आपलीच कथा शोधून आपणच त्या चित्रपटाला Hit करतो.

प्रेमा बद्दल खलिल जिब्रान याने त्याच्या "Prophet" प्रेषित ह्या प्रसिद्ध पुस्तकात केलेले वर्णन अवर्णनीय आहे.


“When love beckons to you follow him, Though his ways are hard and steep. And when his wings enfold you yield to him, Though the sword hidden among his pinions may wound you. And when he speaks to you believe in him, Though his voice may shatter your dreams as the north wind lays waste the garden. For even as love crowns you so shall he crucify you. Even as he is for your growth so is he for your pruning. Even as he ascends to your height and caresses your tenderest branches that quiver in the sun, So shall he descend to your roots and shake them in their clinging to the earth......
But if in your fear you would seek only love's peace and love's pleasure, Then it is better for you that you cover your nakedness and pass out of love's threshing-floor, Into the seasonless world where you shall laugh, but not all of your laughter, and weep, but not all of your tears. Love gives naught but itself and takes naught but from itself.
Love possesses not nor would it be possessed; For love is sufficient unto love. And think not you can direct the course of love, if it finds you worthy, directs your course. Love has no other desire but to fulfil itself."
But if you love and must needs have desires, let these be your desires: To melt and be like a running brook that sings its melody to the night. To know the pain of too much tenderness. To be wounded by your own understanding of love; And to bleed willingly and joyfully.”
― Khalil Gibran, Le Prophète


जेव्हा प्रेम तुम्हाला खुणावून बोलाविल तेव्हा तुम्ही त्याच्या मागोमाग जा 
त्याचे मार्ग बिकट आणि उभ्या चढणीचे असले तरी !
आणि जेव्हा त्याचे पंख तुम्हाला आपल्या मिठीत घेतील तेव्हा तुम्ही त्याच्या स्वाधीन व्हा...
जरी त्याच्या पंखात लपलेली तलवार कदाचित तुम्हाला जखमी करणार असली तरी!


परमेश्वर आणि प्रेम ज्याने त्याने आपापले शोधायचे असते.
आणि जेव्हा तुम्हाला त्याची अनुभूती येते तेव्हा त्याची जाहिरात करायची नसते.जाहिरात करण्याची इच्छा अधर्माला जन्म देते आणि पुढे तोच अधर्म धर्म  नावाने  फोफावतो.





















Sunday, February 2, 2014

कर्मयोग आणि भारतीय राजकारण

गांधीना विरोध करणे हि तरुण पिढी मध्ये आपला वेगळेपणा सिद्ध करण्याची सोपी पद्धत कधी रूढ झाली ते मला माहित नाही , पण मी शाळेत असतांना कळत नसूनही सभोवतालील गांधी विरोधी विचार ऐकून मी पण गांधी विरुद्ध माझ्या आजोबांसमोर बोललो आणि आजोबा म्हणाले 

"गांधी वर मत द्यावे एवढे तुझे वयही नाही आणि अभ्यासही नाही. त्यांनी देशासाठी जे केले त्यात काही चुका झाल्या असतीलहि 
पण देशाला बरेच काही दिले हे सुद्धा एक सत्य आहे.तर त्याचा आदर करायला शिक. चुका तर मानव जन्म घेतल्या नंतर देव चुकवू शकले नाहीत; आपण तर सर्व सामान्य माणसे आहोत. "

अश्या माझ्या आजोबां सोबत महाभारतातील गोष्टी ऐकत माझे बालपण घडत गेले. माझ्या आजोबांनी मला नेहमी कर्मयोगाचे महत्व शिकवले. ते म्हणायचे

" तुमच्या वाट्याला जे आले आहे किवा तुम्ही जो व्यवसाय स्वीकारला आहे तो खऱ्या अर्थाने एक कर्मयोगी बनून तुम्ही पूर्ण केला पाहिजे. तुम्ही सैनिक असाल तर  शत्रूला मारणे तुमचे कर्तव्य आहे तेथे अहिंसे बद्दल विचार करून चालणार नाही. तुम्ही डॉक्टर असाल तर रोग्याला बरे करणे हे तुमचे कर्तव्य आहे. त्याच्यामुळे मला रोग झाला तर असा विचार करून
 तुम्हाला चालणार नाही. शिक्षक असाल तर खरे विद्यादान करणे तुमचे कर्तव्य आहे आणि राजकारणी असाल तर  खऱ्या अर्थाने जनतेच्या भल्यासाठी तुम्ही राजकारण करणे हेच तुमचे कर्तव्य आहे."

कर्मयोगाचे जिवंत उदाहरण बघायचे असेल तर तुम्ही तुमच्या घरात Furniture चे काम केले असेल तर ते काम करणारा राजस्थानी मिस्त्री आठून बघा . मी नेहमीच त्या लोकांच्या काम करायच्या पद्धतीने
भारावतो. कर्मयोगाचे जिवंत उदाहरण असते ते. आणि त्या कर्मायोगातून साकारते आर्किटेक्चर आणि तुमच्या स्वप्नातील घराचे सुंदर रूप.
आता त्या पाठोपाठ बिहार आणि युपीचे मिस्त्री सुद्धा तेवढेच खरे कर्मयोगाचे जिवंत उदाहरण म्हणून बघायला मिळतात.

कर्मयोगाचे आणि मर्यादेचे महत्व तुम्हाला निसर्गाकडून जास्त चांगल्या पद्धतीने शिकता येईल. डोळे बंद करून क्षणभर सूर्यमालेचा विचार करा किंवा चांदण्या रात्रीत चमकणाऱ्या आकाशातील ताऱ्यांकडे बघून विचार करा किती करोडो वर्षापासून सूर्य आणि त्याच्या भोवती आपल्या नेमून दिलेल्या कक्षेत हे सर्व  ग्रह आणि तारे फिरत आहेत.
विचार करा मंगळाला असे वाटले आता बस झाले सूर्याची दादागिरी आता मी BOSS माझ्या भोवती ह्यांनी फिरायला हवे तर काय होईल?



सध्या भारतीय राजकारणातील अनेक राजकीय ग्रहांना सूर्य (पंतप्रधान)  होण्याचे वेध लागले आहेत. बघू या कोण होते ते. मला राज कारणाचा जास्त अभ्यास नाही पण काही दिवसांपूर्वी वाचलेले मोदींच्या काल्पेनेतील भारत हे विचार आवडले.


चांगले विचार  हे चांगलेच असतात सत्तेवर कोणीही आले तरी त्यांनी ह्याचा पाठपुरावा करावयास हवा.
फक्त विरोधाला विरोध म्हणून चांगल्या विचारांना विरोध कोणी करू नये.

खैरात म्हणून मिळालेल्या पैश्या पेक्षा कर्मयोगाने कष्ट करून मिळविलेला पैसा श्रेष्ट ह्याची शिकवण आणि आठवण हि आपली खरी भारतीय संस्कृति आहे ह्याची जाण तळागाळा पर्येंत करून देण्याची गरज आहे आणि त्या साठी तश्या योजना आखण्याची खरी गरज आहे.

भ्रष्टाचार मिटवणे हे गरजेचे आहे पण त्यामागे विकासाचा मुद्दा मागे पडावयास नको ह्याची पण खबरदारी घेणे हीच काळाची आणि भारतीय राजकारणाची खरी गरज आहे.

भारतीय राजकारण आणि निवडणूक 2019