Monday, February 12, 2018

Indian Family System 2030


भारतीय कुटुंब व्यवस्था २०३०

Happy Family Index



रोटरी  क्लब ऑफ  पुणे गांधीभवन यांनी आयोजित केलेल्या  Oratorian 2018 स्पर्धेत  भारतीय कुटुंब व्यवस्था २०३० (Indian Family System 2030)  ह्या विषयावर  १० मिनिटात  माझ्या मनात  घोळत असलेले विचार लोकांपर्येन्त पोहचविण्याची संधी मिळाली आणि मी त्यात यशस्वि हि झालो कारण तिन्ही परीक्षकांनी (वंदना बोकील-कुलकर्णी,उमेश आगाशे आणि तुषार सोनजे Vandana Bokil-Kulkarni, Umesh Agashe and Tushar Sonjeह्या तिघांनी  त्यांच्या भाषणामध्ये मी मांडलेल्या  मुद्द्यांचा उल्लेख  केला. श्रोत्यांमधील  एक श्रोता म्हणाला "भाषण उत्तम झाले  आता बोलले त्या प्रमाणे पुढे कृतीही करा ." तेव्हा आपण पुण्यात आहोत  ह्याची जाणीव झाली आणि  त्याच बरोबर भावना पोहोचल्याची पावतीपण मिळाली. 

   






Our Rotary club of Pune Shivajinagar Team






नमस्कार  व्यासपीठावरील मान्यवर  आणि कुटूंब वत्सल  श्रोतेगण 

आजचा  माझा विषय  2030 मधील भारतीय कुटुंब व्यवस्था हा आहे 


कुटुंब व्यवस्था जगात सगळीकडे आहे. परंतु भारतात ती खूप खंबीर आहे अशी जगभरात मान्यता आहे  . आणि २०३० मध्ये ती आणखी खंबीर होण्याच्या दिशेने आपण सर्वांनी मिळून प्रयत्न आतापासून करावयास हवे.  नाहीतर एके काळी  भारतातील कुटुंब व्ययस्था खूप खंबीर होती असा इतिहास २०5० नंतर सांगितला  जाईल.  


तुम्ही म्हणाल असा विचार मनात का आला ?


तर ह्याचे उत्तर संध्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि संयोजकांनी स्पर्धेसाठी  निवडलेला  हा विषय 

हेच आहे  .  कारण आगी शिवाय धूर नसतो … काहीतरी उलथापालथ सामाजिक स्तरावर वैचारिक स्तरावर नक्कीच घडत आहे… किंबहुना ती सतत घडत असते . परिवर्तन  बदल हीच एक स्थिर गोस्ट आहे. Change is the only constant.



तर आधी आपण सद्य परिस्तितीत काय घडत आहे ह्याचा आढावा घेऊ 


१. बुद्दिजीवी तरुणाई म्हणते लग्न हि संकल्पना मोडीत निघत आहे. Live in relationship is a new trend. आता असे विचार तर २०३० मध्ये काय?


BTW Live in relationship ला मराठीत काय म्हणतात हे मी गुगल करून शोधायचा प्रयत्न केला पण उत्तर मिळाले नाही.  गंधर्व विवाह म्हणजे प्रेम विवाह . जो दुष्यन्त शकुंतला ह्यांनी  केला होता आणि त्यांच्या प्रेमाचे फळ त्यांचा पुत्र भरत ज्यामुळे आपल्या  देशाचे नाव भारत असे पडले. 

  

२. छोट्या छोट्या कारणावरून  घटस्फोटाचे वाढते प्रमाण 


३. दिवसेन दिवस  एकत्र कुटुंब पद्धतीचा होणार ऱ्हास आणि विभक्त कुटुंब पद्धती मध्ये होणारी वृद्धी आणि त्याला घटस्फोटाचा बागुलबुवा  


४. नौकरी निमित्त परदेशी गेलेली मुले आणि त्यांचे कुटुंब  आणि वर्षभरातात परदेश आणि भारत वाऱ्या करणारे रिटायर्ड आई वडील आणि त्यांचे भारतातील कुटुंब 


५. आणि दुष्काळात तेरावा महिना  म्हणावा कि काय नुकताच  आलेला अहवाल सांगतो  तरुण मुलींचे गुणोत्तर प्रमाण  २०२१ मध्ये ९०४ आणि २०३१ मध्ये ८९८  असेल असा अंदाज आहे. 


ह्या सर्व पार्श्वभूमीवर २०३० मधील भारतीय कुटुंब व्यवस्था कशी असेल. ? 


आपण  देशाची प्रगती GDP ( gross domestic product ) बघून ठरवतो पण मला वाटते देशाची खरी प्रगती मोजायची असेल तर (Happy Family Index असे नवीन मोजमाप शोधावयास  हवे आणि २०३० मधे त्याचा वापर करायची तयारी आतापासूनच करावयास हवी 


आणि त्यासाठी टेकनॉलॉजि चा उपयोग करता येऊ शकतो 

तुम्ही म्हणाल काहीतरीच काय टेक्नॉलॉजी काय करणार 

तर नुकताच  टेक्नॉलॉजी  मुले समाजात घडलेला एक बदल नमूद करू इच्छितो  


उबेर/ओला  ह्या मुळे झालेला बदल लक्षात घ्या 

सर्विस देणारे म्हणजे ड्राइवर आणि सर्विस घेणारे म्हणजे प्रवासी दोघांनाही शिस्त लावण्याचे काम टेक्नॉलॉजी ने केले आहे हा खरोखरीच विचार करण्याचा मुद्दा आहे. 

दोघं पैकी फक्त एकाला डोक्यावर बसविण्या पेक्षा दोघांकडूनही विश्वास आणि उत्तम सेवा ह्या मुल्ल्यांना  अधिक अधिकार आणि महत्व देण्यात आले आहेत. आणि लक्षात ठेवा भविष्यात हेच होणार आहे  विश्वास आणि उत्तम सेवा देणाऱ्या आणि  मूल्य निर्माण करणाऱ्या पद्धतीचं टिकणार आहेत. 


मग ती विवाह संस्था असो 

शिक्षण संस्था असो 

सहकारी संस्था असो 

कंपनी किंवा सर्विस कंपनी असो 

वा  पॉलिटल पार्टी असो 


उत्तम राष्ट्रासाठी उत्तम नागरिकांची गरज असते.उत्तम नागरिक हे चांगल्या कुटुंबातून येतात.

सुखी कुटुंब निर्माण करण्यासाठी माणुसकीची मुल्ले जपावी लागतात.

माणुसकीच्या मुल्यांवर आधारित भारताने केलेली प्रगती नक्कीच उजवी ठरेल असा माझा विश्वास आहे. 


प्रेम,जिव्हाळा,अनुकंपा आणि दयाळूपणा ह्या गुणांनी कुटुंब बांधले जाते.

भारतीय समाजातील कौटुंबिक मुल्ले समजून घेण्यासाठी खालील चार तत्वे विचारात घेतली जातात


१)एक स्त्री व एक पुरुष यामध्ये कधीही न तुटणारा बंध म्हणून विवाहाला पाठींबा.

सद्य परिस्थिती: वाढते घटस्फोटाचे प्रमाण चिंतेचा विषय. 

पण घटस्फोट झाला तरी पती पत्नी चे नाते मित्रत्वाचे असावयास काय हरकत आहे. 

पण जेव्हा लग्न हे फक्त प्रॉपर्टीवर डोळा ठेऊन केले जाते आणि घटस्फोट हि भविष्यातील योजना  असते  तेव्हा लग्न हे पवित्र बंधनाच्या सीमा तोडून एक फक्त व्यवहार मात्र होऊन जाते . 

ह्या प्रकारावर  वेळेतच अंकुश घालण्याची गरज आहे.  



२)कुटुंब संस्थेमध्ये नवरा हा कुटुंब प्रमुख आणि बायको हि कुटुंब उभारणी करणारी कार्यकर्ती


सद्य परिस्थिती: दोघांनी आपापली क्षमता ओळखून स्वताहून जबाबदारी स्वीकारावी किंवा वाटून घ्यावी आणि एकमेकांना  योग्य तो सहयोग मानापमानाचा विचार न करिता द्यावा हि काळाची गरज.



३)मुलांचे शिक्षण त्यांच्यावर होणारे संस्कार आणि शिस्त हि आई वडिलांची जबाबदारी.


सद्य परिस्थिती: इंटरनेटमुळे नको त्या वयात नको ती माहिती आणि संस्कार ह्याची भीती त्यामुळे आई वडिलांची जबाबदारी आणखीन वाढली आहे.


कुटुंब हि प्रत्येक व्यक्तीची पहिली शाळा असते  आणि  आई हि पहिली शिक्षिका 



४)कुटुंबातील वृद्धांची जबाबदारी स्वीकारणे आणि इतर नाते संबंधांबरोबर सुसंवाद साधणे.


सद्य परिस्थिती: वेळेचा अभाव. सोप्या जीवन शैलीचा अभाव आणि उगाच न पेलवणाऱ्या उद्दिष्टांची कास निर्माण करते स्वकीयांपासून दुरावा.



तुम्ही एका सक्षम सुखी कुटुंबाची निर्मिती केली आहे असा तुमचा विश्वास असेल तर मग तुमच्या कुटुंबाच्या सभासदांची कक्षा वाढवून बघा.

तुमच्या कुटुंबासाठी काम करणारा वर्ग तो पण तुमच्याच कुटुंबाचा हिस्सा आहे हा विचार करून बघा.

परदेशी  राहून आलेल्या लोकांना घरकामासाठी कामगार वर्ग मिळणे हि आपल्या देशात केवढी मोठी उपलब्धी आहे ह्याची नक्कीच जाणीव असेल. पण बाई आणि मलिकनबाई ह्या दोघांनीही काळाची गरज ओळखून विश्वास आणि ऊत्तम सेवा दोन्ही बाजूंनी वाढवून मूल्य निर्मिती करण्याची  गरज आहे नाहीतर हा पण इतिहास व्हायला वेळ लागणार नाही.

गावाकडे शेती साठी मजूर मिळणे दिवसेन दिवस कठीण होत चालले आहे. त्यावरही विचार करावयास हवा . त्यामुळे  शेतीसाठी  नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतावर नवीन जीवन शैलीचा आनंद घेणारी जास्तीत जास्त सुखी कुटुंबे २०३० मध्ये निर्माण होतील असा माझा विश्वास आहे.  तसे झाले तर गावांचा विकास होईल आणि शहरांकडे येणार ओघ थांबेल. 


तुम्ही एखादी कंपनी चालवीत असाल किंवा एखादया संस्थेवर काम करीत असाल तर ते पण तुमचे कुटुंबच आहे असा विचार करून ते पण सुखी करण्या साठी प्रयत्न करून बघा.

तुमच्याच सुखात भर पडेल. थोडक्यात २०३० मधील कुटुंब व्यवस्था वसुधैव कुटुम्बकम् च्या दिशेने वाटचाल करणारी असेल असा माझा विश्वास आहे. आणि तरुणाई नक्कीच त्या दिशेने वाटचाल करेल . गरज आहे त्यांना समजावून घेऊन जुन्या नियमातील नि काढून यमाचे म्हणजे मूल्यांचे मूल्य नवीन पिढीच्या नवीन विचारांच्या नियमात बसवून मान्य करण्याची. नियम हे कालानुरूप बदलत असतात पण त्यातील मूल्य म्हणजे यम हे त्रिकालाबाधित सत्य असते. 




Sunday, February 4, 2018

पत्रास कारण की



पत्रास कारण की.. 

ती. रु. आजोबा ,

त्रास कारण कि आज  आयुष्यातील रिटायरमेंट च्या दशकात येऊन पोहोचलो आहे . तेव्हा ह्या पत्रा  द्वारे तुमच्याशी थोडे बोलावे असा विचार केला. खर म्हणजे तुमच्याशी बोलणे हा बहाणा आहे त्या निमीत्ताने   स्वतःशीच  बोलावे हा इरादा आहे. आजोबा  लहानपण  कोणतेच डिजिटल गॅझेट नसल्यामुळे डब्बा गोल,विटी दांडू सूरपारंब्या  असले खेळ खेळण्यात मजेत गेले तसेच तुमच्या सोबत महाभारतातील गोष्टी ऐकत माझे बालपण घडत गेले. आता डिजिटल गॅझेट च्या दुनियेत मुले हरवली आहेत आणि मैदानी खेळ खेळायला विसरली आहेत त्या  दोघांचा सुवर्ण मध्य समजावून सांगणाऱ्या तुमच्या सारख्या आजोबांची सध्या खूप गरज आहे. 

थोडा मोठा  झालो तेव्हा  क्रिकेट  कळायला लागले आणि रेडिओवर  फक्त  कोमेंट्री  ऐकून  एवढ्या    Excitement चा अनुभव मिळू शकतो ते  अनुभवास मिळाले . त्यानंतर  टीव्ही आणि अमिताभ ने वेड लावले. अगदी लहानपणी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला देश भक्तीची गाणी  आणि स्वतंत्र लढ्याच्या कथा ऐकून भारावून जात होतो . पण अमिताभ च्या ज्वलंत अभिनयामुळे मुळे  म्हणा किंवा  आयुष्यात आलेल्या काही कटू अनुभवांमुळे म्हणा आयुष्यातील ग्रे शेड जाणवायला लागली कधी आणि आवडायला लागली कशी हे कळलेही नाही. लहान पणा  पासून  कृष्ण हा माझा आवडता पण कृष्णकृत्य हे चांगल्या अर्थी का वाईट हा संभ्रम माझा अजूनही आहे. तसेच गांधी चांगले होते का वाईट हा प्रश्न मला लहानपणीच  पडला होता. पण तुम्ही  योग्य वेळी मला योग्य मार्गदर्शन करून नीट समजावले . मी एकदा तुमच्या  समोर गांधी विरोधी मत प्रदर्शित केले तेव्हा तुम्ही  म्हणाले. "गांधी वर मत द्यावे एवढे तुझे वयही नाही आणि अभ्यासही नाही. त्यांनी देशासाठी जे केले त्यात काही चुका झाल्या असतीलहि पण देशाला बरेच काही दिले हे सुद्धा एक सत्य आहे.तर त्याचा आदर करायला शिक. चुका तर मानव जन्म घेतल्या नंतर देव चुकवू शकले नाहीत; आपण तर सर्व सामान्य माणसे आहोत. "


आजोबा तुम्ही  महाभारतातील गोष्टी सांगून आणि त्याचा खऱ्या जीवनाशी असलेला संबंध समजावून   माझे बालपण घडवले त्या बद्दल तुमचे खूप खूप  आभार . तुम्ही  मला  नेहमी कर्मयोगाचे महत्व शिकवले.  तुम्ही म्हणायचे

" तुमच्या वाट्याला जे आले आहे किवा तुम्ही जो व्यवसाय स्वीकारला आहे तो खऱ्या अर्थाने एक कर्मयोगी बनून तुम्ही पूर्ण केला पाहिजे. तुम्ही सैनिक असाल तर  शत्रूला मारणे हेच तुमचे कर्तव्य आहे तेथे अहिंसे बद्दल विचार करून चालणार नाही. तुम्ही डॉक्टर असाल तर रोग्याला बरे करणे हे तुमचे कर्तव्य आहे. त्याच्यामुळे मला रोग झाला तर असा विचार करून  तुम्हाला चालणार नाही. शिक्षक असाल तर खरे विद्यादान करणे तुमचे कर्तव्य आहे आणि राजकारणी असाल तर  खऱ्या अर्थाने जनतेच्या भल्यासाठी तुम्ही राजकारण करणे हेच तुमचे कर्तव्य आहे."


आजोबा महाभारत युद्धामध्ये कौरव बरोबर होते का पांडव ? हा प्रश्न तुम्हाला विचारायचा राहुल गेला कारण कृष्ण ज्या बाजूने तेच योग्य आणि तेच जिंकणार हीच त्या वेळेची समज आणि भावना होती.  आजच्या भारतातील राजकीय महाभारत युद्धामध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.  २०१९ च्या निकालानंतर कळेल कृष्ण कोण आणि कोणत्या बाजूने होता. 😊

तुम्हाला माहित आहे का? असल्यास कळवावे . लोभ असावा. 

आपला ,

रो. संजीव चौधरी