Sunday, August 12, 2012

मर्यादेचे महत्व आणि कर्मयोग

तुम्हाला नेमून दिलेले काम चोखपणे पूर्ण करायचे ह्यालाच कर्मयोग म्हणतात. कर्मयोगाचे आणि मर्यादेचे महत्व तुम्हाला माणसांपेक्षा निसर्गाकडून जास्त चांगल्या पद्धतीने शिकता येईल. डोळे बंद करून क्षणभर सूर्यमालेचा विचार करा किंवा चांदण्या रात्रीत चमकणाऱ्या आकाशातील ताऱ्यांकडे बघून विचार करा किती करोडो वर्षापासून सूर्य आणि त्याच्या भोवती आपल्या नेमून दिलेल्या कक्षेत हे सर्व  ग्रह आणि तारे फिरत आहेत. विचार करा मंगळाला असे वाटले आता बस झाले सूर्याची दादागिरी आता मी BOSS माझ्या भोवती ह्यांनी फिरायला हवे तर काय होईल?


कर्मयोग म्हणजे जे आपले नेमून दिलेले काम आहे ते ते चोखपणे बजावणे . मी जेव्हा Engineering पूर्ण केल्या नंतर ICIM सारख्या त्या काळातील मोठ्या कंपनी मध्ये Management Trainee म्हणून Join झालो तेव्हा माझ्या पहिल्या BOSS ने मला एक गुरु मंत्र दिला होता . तो मंत्र म्हणजे नौकरीमध्ये  "धु म्हटले कि धुवायचे असते ..." पुढचे वाक्य सर्वांना माहित असेलच ते मी येथे लिहू शकत नाही :) तर थोडक्यात तुम्हाला नौकरी करायची असेल तर एक लक्षात ठेवायचे BOSS IS ALWAYS RIGHT. You should follow what you have been told to do . आणि तुमची फारच घुसमट होत असेल तर सरळ नौकरी सोडून दुसरी बघावी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करून तुम्हाला हवे तसे तुमचे विश्व तुम्ही निर्माण करावे. कोणामुळे कोणाचेही अडत नसते हे Universal Truth समजावून घेवून स्वतः बद्दल झालेल्या गोड गैरसमजांना आळा घालावा.

असे म्हणतात हे सर्व एका महास्फोटातून निर्माण झाले "the big big blast the reason I a'm alive..." 
आणि जे निर्माण होते ते कधी ना कधी संपते हे सुद्धा एक सत्य आहे.




काही काही गीतकार त्यांच्या गाण्यातून  खुप मोठे  सत्य सहज सांगून जातात आणि संगीता मूळे त्या भावना मनाला भिडतात असेच एक इंदीवर यांनी लिहिलेले आणि कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेले सफर ह्या चित्रपटातील अप्रतिम गाणे
ओ नदिया चले चले रे धारा चंदा चले चले रे तारा
तुज़को चलना होगा , तुज़को चलना होगा
जीवन कही भी ठहरता नहीं हैं
आंधी से तूफान से डरता नहीं हैं
तू न चलेगा तो चल देंगी राहें
मजिल को तरसेंगी तेरी निगाहें
तुज़को चलना होगा , तुज़को चलना होगा








No comments: