Tuesday, August 28, 2012

eGovernance-संगणकीय शासन तुमच्या दारी..

काल डॉ . दीपक शिकारपूर यांच्या १९व्या पुस्तकाच्या अमेय प्रकाशनाच्या प्रकाशन सोहळाल्या उपस्थित राहण्याचा योग आला आणि त्या निमित्ताने डॉ. दीपक शिकारपूर ,मुख्य पाहुणे पद्मश्री विजय भाटकर , MKCL चे MD श्री विवेक सावंत आणि Former chief secretary of the state अजित निंबाळकर यांची व्याखाने ऐकण्याची संधी मिळाली. डॉ. दीपक शिकारपूर यांनी कॉम्पुटर आणि IT (Information Technology) ह्याबद्दलची बहुमूल्य माहिती महाराष्ट्रातील तळागाळातील व्यक्ती पर्येंत पोहचविण्याचे काम हि सर्व पुस्तके मराठीत लिहून समाजासाठी खरच खूप मोठे योगदान दिले आहे। हे पुस्तक eGovernance ह्या
क्षेत्रात रोजगाराच्या ,व्यवसायाच्या आणि career च्या विचारांना नक्कीच चालना देईल.





श्री विवेक सावंत यांचे भाषण म्हणजे एक "IT योग गुरु" बोलतो आहे असेच वाटते.eGovernance चा उपयोग जर माणुसकी हरवलेल्या शासनातील खऱ्या माणुसकीचा अनुभव सर्व सामान्याला जाणवेल ह्या साठी झाला तर तो खरा eGovernance चा उपयोग असेल हा विचार मनाला भिडला। सर्व सामान्य व्यक्तीने त्याच्या साठी असलेल्या सुविधा खेटे घालून मिळवण्या पेक्षा शासनच तुमच्या दारी येऊन तुमच्या हक्काची सुविधा तुम्हाला देईल ते खरे शासन।
Former chief secretary of the state अजित निंबाळकर ह्यांनी शासन आणि Computer ह्या बद्दलचे त्यांचे प्रत्यक्ष अनुभव सांगितले. भारतात कॉम्पुटर आणि TV चा प्रवेश कसा झाला ह्या बद्दलची बरीच माहिती त्यांनी दिली.मुख्य पाहुणे पद्मश्री विजय भाटकर ह्यांचे झंझावती भाषण त्यांच्या प्रदिर्घ अनुभवाची आणि प्रचंड कार्याची झलक दाखवून गेले . जाता जाता ते सांगून गेलेत .

Right to Right Education and Right to Right Government
हा येणाऱ्या काळातील विकासाचा मंत्र असेल .

No comments: