Saturday, August 25, 2012

जे आपण पेरतो तेच उगवते...

११ ऑगस्ट ला मुंबईत झालेली दंगल आणि त्यामुळे देश्याच्या सुरक्षते बद्दल निर्माण झालेले प्रश्न आणि त्याचे उत्तर येणारा काळच देईल. आपला देश तो ज्या कोणत्या परिस्थितीत आहे त्याला सर्वस्वी जबाबदार आपणच असतो. "जे आपण पेरतो तेच उगवते" त्यामुळे भविष्यात जर आपलाल्या हवा असणारा India ,भारत (आता नावावर वाद नको) हवा असेल तर त्याची बीजे वर्तमानातच पेरावी लागतील.

मला राजकारणातले काही जास्त कळत नाही आणि तो माझा प्रांतही नाही पण माझा भारतात जन्म झाल्या मुळे आता भारतवासी असल्या मुळे ह्या देशावर प्रेम करणे मी माझे कर्तव्य समजतो आणि त्या प्रश्च्यात ह्या देशाने पर्यायाने हा देश चालविणार्यांनी माझ्या बेसिक गरजा पूर्ण करव्यात अशी अपेक्षा करतो. रोटी ,कपडा मकान ह्या पेक्षा हि सर्वात महत्वाची असते ती सुरक्षा. ज्या साठीच देशाच्या सीमांची निर्मिती होवून देश निर्माण होतात आणि देश चालवण्यासाठी जे लोक कारणीभूत असतात त्याचीच ती जबाबदारी असते. फार पूर्वी एक रशियन प्रवासी भारत भ्रमण केल्यानंतर म्हणाला होता.

"माझा परमेश्वरावर विश्वास नाही पण भारत भ्रमण केल्यानंतर पटायला लागले परमेश्वर असलाच पाहिजे नाहीतर हा देश कसा चालला असता."

मी जेव्हाही सरकारी कामा साठी सरकारी खात्यात जायचो तेव्हा "राम भरोसे" अस्ताव्यस्थ पडलेल्या Files बघून मलाही तसाच प्रश्न पडायचा.पण आता IT (Information technology) मुळे बरेच काही बदलत चालले आहे. पण फक्त अस्ताव्यस्थ पडलेले Document Digital document करून खरे प्रश्न सुटणार आहेत का.
मुळातच फक्त मता साठी निर्माण झालेल्या खोट्या कागदपत्राचे देश सुरक्षेसाठी देश प्रेमापोटी जाती,धर्माच्या पलीकडे जाऊन फक्त देश हितासाठी खरे Audit करण्याचे धैर्य कोणी दाखवेल का?

भविष्यात भारत सुपर पावर बनेल का? ह्या प्रश्नावर कात्थ्याकुट करण्यापेक्षा माझ्या देशाला चांगले धडविण्यात माझा काही role असेल का ह्याचा प्रत्येकाने विचार केला तर आपण भविष्यात सुपर पावर नाही पण world politics मध्ये महत्वाचा role play करू ह्यात मला शंका वाटत नाही. मी तर ठरवले आहे तुम्ही पण ठरवा.


इतनी शक्ति हमें दे न दाता
मन का विश्वास कमजोर हो ना!
....
हम ना सोचे हमें क्या मिला हैं
हम ये सोचे किया क्या हैं अर्पण!









No comments: