Tuesday, May 12, 2020

Healthy lifestyle key to fight against Corona





Everybody, please add *KAPALBHATI* or any breathing exercise to your everyday exercise routine. And check your stamina to hold your *BREATHE*. You can use mobile clock stopwatch.
Mine is 40-45 second. What is yours?
Improving your inner power is the best way to fight against Corona.


In fighting against Corona Virus,  the most important thing you should do in your lockdown period is , “improve your inner fighting power, improve your immune system” . To do this you should try to follow a healthy lifestyle. Regular exercise, Yoga , enough sound sleep and healthy diet habits are the key points of the healthy lifestyle. 

Other than this one morning drink I found really very effective and that is after waking up,  drink a glass of warm water with Haldi (Turmeric ) and lemon juice. In case of throat infection, you can gargle with turmeric mixed warm water.


कोरोनासे   डर  लगता  है  फिर  आप  लेते  क्यूँ  नही !

Add caption



One day on my terrace I was having this glass of water with Haldi (Turmeric ) and lemon morning healthy drink and discussed this with our neigbhour uncle Chakraborty and from that day he aslo started having this morning healthy drink of 
haldi with warm water and  lemon and confirmed that it is very useful.

Photograph on 11-May-2020


My dad is a Doctor by profession but long back I told him, about this 
 haldi with warm water and  lemon monrning drink  and sicnce then my dad and mom (84 & 80) both are having this morning healthy haldi with warm water and  lemon drink regularly.  

Photograph on 31-Jan-2020



रोज सकाळी उठल्यावर दात घासायच्या आधी मी हळद,लिंबू आणि थोड्या प्रमाणात मिरपूड अश्या सशक्त पेयाने दिवसाची सुरुवात करतो. तुम्हीहि करून बघा काही दिवसातच फरक जाणवेल.


थोडे रोजच्या व्यायामा विषयी

तुमचे स्वस्थ आणि निरोगी शरीर हीच तुमची खरी शक्ती असते . तुमचे शरीर स्वस्थ आणि निरोगी नसेल तर प्रेम आणि ज्ञान मनातल्या मनात मरून जातील. मग तुम्ही कितीही कमावलेली पैश्याची शक्ती तुमच्या काही उपयोगी येणार नाही . पैसा आयुष्यात महत्वाचा आहेच पण प्रेम आणि ज्ञान ह्याशिवाय सुखाचा शोध पूर्ण होऊ शकत नाही . प्रेम आणि ज्ञान ह्यांना तुमच्या जीवनात आणायचे असेल तर बळाची (पैसा आणि निरोगी शरीर) ह्याची नितांत आवश्यकता असते. बलवान निरोगी शरीर , निर्मळ आणि सतेज बुद्धी आणि प्रेमळ परंतु प्रसंगी वज्राप्रमाणे कठोर होणारे ह्रुदय ह्या सर्वांची जीवनातील खर्या सुखाचा शोध घेण्यासाठी नितांत आवश्यकता असते. ह्या निरोगी ,स्वच्छ ,स्वस्थ शरीराच्या द्वारा सर्व पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा असतो. 

म्हणून नियमित व्यायामाची सवय असणे खूप गरजेचे असते. तुमच्या व्यायामात खालील तिन्ही प्रकाराचा समावेश असणे आवश्यक आहे.


महत्वाची सूचना: कोणताही व्यायाम करण्या आधी वॉर्म अप करणे आवश्यक असते 

1)Stamina and Power- Aerobics, Running, Walking, Weight lifting,Pushups
१)शक्ती आणि क्षमता ( धावणे आणि वजन उचलणे,पुशप , सूर्यनमस्कार )

2)Stretching - ( Yoga - stretching exercise)
२) ताणाचे व्यायाम ( योगासन ,सूर्यनमस्कार)

3)Yoga - (Breathing exercise & Meditation)
३)योग - कपालभाती , प्राणायाम आणि ध्यान


सूर्यनमस्कार हा एक परिपूर्ण व्यायाम प्रकार आहे.



तुम्ही कोणत्याही वायोगटातील असाल आणि तुमचा आवडता व्यायाम प्रकार कोणताही असेना परंतु त्यात सुर्यनमस्काराची भर घालून तुम्ही काही दिवसातच अचंभित करणारे बदल तुमचे तुम्ही अनुभवू शकतात.

तुम्ही कोणताही व्यायाम प्रकार करीत असाल पण त्यासाठी शरीर आधी वार्म-अप करणे जरुरी असते हे तुम्हाला माहीतच असेल.तर तुमच्या वार्म-अप प्रकारात सुर्यानमस्काराची भर घालून बघा आणि काही दिवसातच तुम्हाला हवे असलेले बदल दिसावयास लागतील

सूर्यनमस्कार म्हणजे १२ आसने आपण अनुक्रमाने करतो.
प्रत्येक आसन घेतल्यानंतर त्या अवस्थेत जास्तीत जास्त वेळ थांबवायचा प्रयत्न तुम्ही करावयास हवा.
थोडक्यात पोझिशन घेतल्या नंतर मनातल्या मनात १० ते २१ पर्येत जसे जमेल तसे मोजा आणि मग पुढच्या पोझिशन कडे वळा.
तुमच्या वयानुसार आणि आवश्यकते नुसार तुम्ही असे ३ ते XXX सूर्यनमस्कार घालू शकता.
त्यानंतर तुम्ही तुमचा आवडता व्यायाम करावा.
कोणताही व्यायाम करितांना खालील गोष्टी लक्ष्यात ठेवाव्या

१) शरीराला झेपेल तेवढाच व्यायाम करावा नाही तर फायद्या पेक्षा शरीराचे नुकसान होऊ शकते. थोडक्यात व्यायाम करतांना शरीराचे ऐका.
२) व्यायामा सोबत शरीराची तेल मालिश सुद्धा खूप आवश्यक असते त्यामुळे रोज जमत नसेल तर आठवड्यातून १ किंवा २ दिवस मालिश साठी ठेवावा मालिश करणे हा एक प्रकारे व्यायामच आहे.
३) व्यायामाबरोबर संतुलित आहाराचीही गरज असते त्यामुळे तुमच्या शरीराला अनुरुप असा संतुलित आहार घ्या. गरज पडल्यास तज्ञांचा सल्ला घ्या.
४)घ्यानाची आवड असल्यास ते पण करून बघा. खरे म्हणजे व्यायाम करतांना तुमच्या शरीराशी संवाद हे एक ध्यानच असते आणि तसे केले कि तुम्हाला हवे असलेले बदल तुम्ही लवकर घडवू शकतात.







Wednesday, February 26, 2020

Digital Marketing Workshop




Conducted workshop on Digital Marketing and Cloud Technology at Arkey Conference Hall for Arkey Group Department staff members. .
Thanks to Ravindra T Kulkarni for organizing this 3 days workshop.
It is always better to upgrade skills of our own team rather than depending on third party and outsourcing our IT requirements






Sunday, February 16, 2020

आमच्या घरातील लग्न




आमचा मोठा मुलगा हर्षवर्धन आणि प्रियंका  ह्यांचे लग्न ३१ जानेवारी २०२० ला  व्यवस्थित  पार पडले. ह्या साठी मी ,  माझी  पत्नी सौ  मीना आणि आमचे व्याही श्री. वामनराव  आणि सौ सविता किनगे ह्यांनी खूप  आधीपासून व्यवस्थित प्लॅनिंग केले होते.  सगळ्यात महत्वाचे म्हणजे  हे लग्न सूट सुटीत  व्हावे आणि सगळ्यांना आनंद देणारे ठरावे असा  आमचा सुरुवातीपासून प्रयत्न होता  आणि त्या साठी काही गरज नसलेल्या   प्रथा  बदलल्या तरी चालतील ह्या मतावर आमच्या दोन्ही कुटुंबाची सहमती होती.  त्या प्रमाणे सतत चर्चा करून  आम्ही लग्नाचे कार्यक्रम सहमतीने ठरविले.  आमच्या ह्या लग्नातील काही ठराविक घटना  नमूद  करतो जेणे करून ज्या घरा  मध्ये लग्न कार्य अपेक्षित आहे त्यांना आमच्या अनुभवाचा लाभ व्हावा.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमचे हे लग्न ऍरेंज मॅरेज आहे. त्यामुळे आधी आम्ही उभयतांनी  प्राथमिक बोलणी केल्यानंतर  दोन्ही मुलांची मोबाइल  द्वारे ओळख करून दिली. हर्षवर्धन पुण्यात आणि प्रियांका बंगलोर येथे होती  .  कुटुंबाची मने जुळली होती  परंतु पुढे जायचे का नाही ह्याचे संपूर्ण अधिकार आम्ही दोन्ही मुलांना दिले होते त्यामुळे दोघांनी समक्ष भेटून चर्चा करून निर्णय घ्याचा होता आणि दोघे वेग वेगळ्या शहरामध्ये असल्यामुळे कोठे आणि कसे भेटायचे ह्यावर फक्त चर्चा व्हायची ठोस निर्णय होत नव्हता .
आणि एक दिवस  प्रियंका आणि तिचा भाऊ कार्तिक यांनी  बंगलोर वरून पुण्याला आमच्या घरी येणाच्या निर्णय घेतला अर्थात त्यांच्या आई वडिलांच्या  संमतीने.  ते आमच्या घरी आले . हर्षवर्धन  आणि प्रियांका दोघांनी एक मेकांशी बोलून  पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्याच दिवशी तिच्या आई वडिलांच्या  संमतीने पुण्यातील तिचे मामा मामी सचिन व जयश्री कोलते  आमच्या कडे आले आणि आम्ही छोटे खानी कुंकवाचा कार्यक्रम  अक्षरशः ४ तासा  मध्ये आटोपला  . तत्परतेने मीनाने जेवणाची घरीच व्यवस्था  केली आणि दुपारच्या ३ च्या बस ने दोघे बहीण भाऊ बंगलोर ला  रवाना  पण झाले.




ह्या नंतर लग्न कोठे करायचे ह्यावर चर्चा झाली आणि लग्न पुण्याला करण्याचा  निर्णय झाला. आणि कोथरूड  मधील सिद्धार्थ पॅलेस हा हॉल ३०-३१ जानेवारी साठी बुक केला .  ह्या हॉल ला एकूण १२ प्रशस्थ  एसी रूम्स  आहेत.  त्यामुळे  गावावरून येणाऱ्या पाहुण्यांची चांगली व्यवस्था हॉललाच  झाली . . ३० जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता हॉल मिळाला आणि नंदा डेकोरेटर्स च्या टीम ने उत्तम  डेकोरेशन  वेळेत तयार करून ठेवले होते त्यामुळे आम्ही ७ वाजता साखरपुडा आणि त्यानंतर हळद असे कार्यक्रम आम्ही वेळेत सुरु करू शकलो . हळदी नंतर  आम्ही संगीत हा कार्यक्रम ठेवला होता. ठरल्या प्रमाणे सगळे वेळेत घडले .  फक्त एक गोष्ट नियंत्रित  करायची राहुल गेली त्यामुळे संगीत १५मिनिट पुढे ढकलावे लागले ते काय इथे लिहीत नाही .
ज्यांना  माहिती  हवे असेल त्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधावा 😃

आमच्या लग्ना  मधील संगीत हा कार्यक्रम थोडक्यात पण खूपच छान झाला असे मत सर्वांनी त्याच वेळेस दिले आणि त्यानंतर यूट्यूब  आणि  फेसबुक वरील views  (१००० च्या   वर ) आणि कंमेंट्स बघून  ते खरोखरच खूप उत्तम झालेत  ह्याची  प्रचिती आली.   विशेष म्हणजे आता पर्येंत आमच्या फॅमिली मध्ये डान्स ह्या क्षेत्रात माझी मोनोपॉली होती पण बाप से बेटा और बेटी सवाई हे सिद्ध  करत  हर्षवर्धन आणि प्रियंकाने खूप सुंदर परफॉर्मन्स देऊन सर्वांची मने जिंकली . प्रियंकाने  कुणालाच कोणतीही पूर्व कल्पना न देता  केलेला कौटूंबिक  नात्यांवर  सादर केलेला परफॉर्मन्स  सर्वांची मने जिंकून गेला .


हर्षवर्धन प्रियांका 




प्रियांका चा  कौटूंबिक  नात्यांवर  सादर केलेला परफॉर्मन्स







संजीव मीना 













हे लग्न कार्य निर्विघ्न पणे पूर्ण होण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या ज्या सर्वांचा सहभाग झाला त्या सर्वांचे आणि परमेश्वराचे मनापासून आभार असाच स्नेह आणि लोभ आमच्या कुटूंबावर असू दे!

धन्यवाद 




Monday, October 21, 2019

Vote for Better India




 वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाही

वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे काय ? असा मी माझ्याच मनाला प्रश्न विचारला तर उत्तर आले "भारत देशाच्या लोकशाहीवर आधारित घटनेच्या चौकटीत बसणारी आपण निवडलेली जीवन जगण्याची पद्धत म्हणजे आपले वैयक्तिक स्वातंत्र्य" पण ते वैयक्तिक स्वातंत्र्य जगतांना तुमच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीलाही तेवढेच वैयक्तिक स्वातंत्र्य आहे ह्याचे भान ठेवावयास हवे.

Consider the rights of others before your own feelings, and the feelings of others before your own rights. John Wooden

देशाच्या घटनेच्या चौकटीत तुमच्या वैयक्तिक स्वातंत्र्याची चौकट बसावितांना तुम्हाला आणखी एका चौकटीचा विचार करावा लागतो ती म्हणजे तुमच्या जन्मामुळे तुम्हाला मिळालेली सामाजिक चौकट. तिचे

अस्तित्व मानायचे कि नाही हे सर्वसी तुमच्यावर अवलंबून असते आपल्या घटनेने तेवढे अधिकार आपलाल्या दिले आहेत ह्यावरच आपली घटना किती चांगली आणि उच्च प्रतीची आहे ह्याची तुम्हाला आज नाही पण काही वर्षानंतर नक्कीच प्रचीती येईल. चीन प्रगती करतो आहे आणि आपणही Developing Countries च्या शर्यती मध्ये आहोत पण माणुसकीच्या मुल्यांवर आधारित भारताने केलेली प्रगती नक्कीच उजवी ठरेल असा माझा विश्वास आहे. सध्या विश्वास बसायला अवघड जाईल पण येणारा काळ नक्कीच ह्याचे होकारात्मक उत्तर देईल.

घटना म्हणजे नियम आलेच आणि नियमा बद्दल मागील एका ब्लॉग मध्ये मी माझे विचार लिहिले आहेतच.


"नियम हे  समाज सुधारणे साठी  समाजातील लोकांच्या भल्या साठी असतात पण प्रत्येक  नियमात एक पळवाट  लपलेली असते किंवा त्याच नियमाचा उपयोग त्रास देण्यासाठी सुद्धा करता येतो.ते शोधून त्याचा दुरुपयोग करणे आणि नियम करणार्यांनी  त्याच्याकडे काना डोळा करून समर्थन करणे हे प्रकार जेव्हा समाजात वाढत जातात तेव्हा समाज व्यवस्था रसातळाला जाण्यास सुरुवात होते. तेव्हा समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने नियमातील यमाचा विचार करूनच नियम पाळावयास हवेत.नियम म्हणजे जे काळनुरूप बदलत जातात. नियमातील यम हा भाग त्रिकालाबाधित सत्य असतो आणि तसाच राहतो. ह्याचे भान समाजातील सर्व लोकांनी ठेवणे आवश्यक असते."

असाच एक "सहकार" कायदा ज्याचा खरा उद्देश खूप चांगला पण "मिल बाटके खाव" वृत्तीने पार वाट लागून वाया गेलेली एक चळवळ. Professional, Attitude ह्या नावाखाली आत्मकेंद्रित झालेल्या तरुण पिढीला तर सहकार ह्या बद्दल किती माहिती असेल ह्याबद्दल शंकाच वाटते. पण सहकारात जो सावळा गोंधळ चाललेला असतो ते बघून त्यांची अनास्था योग्यच वाटते.पण हे चित्र बदलायला हवे आणि सरकारने उचललेल्या पाउलास आपण योग्य प्रतिसाद देऊन एक आशावादी चित्र निर्माण करावयास हवे.

अर्थात सोशल मीडिया ,  सोशल एंटरप्राइज  ,सोशल बिझनेस   हि सगळी सहकाराची २१  व्या  शतकातील नवीन रूपे  आहेत आणि तरुण पिढी ती आत्मसात करीत आहेत किंवा  नसेल तर त्यांनी नक्कीच त्याबद्दल माहिती करून घ्यावीत.  काळाच्या ओघात  परिस्थिजन्य बदल हे आवश्यकच असतात टिकून आणि तग  धरून राहण्या साठी . 



















Saturday, July 27, 2019

Submit Online Incometax e-filing and e-verify ITR online




Be a proud Indian by being a PROUD Tax payer.
Now you can submit your INCOMETAX RETURNS yourself very easily.
You just need to be a Digitally Smart. TRY Yourself and Submit your IT return
You are working hard for to serve your employer or working hard to generate Employment for your own business, in either case submitting your ITR is mandetory.

Last date to submit Iincometax return for Individual Salary , Business is 31st August 2019.

Here are the steps to submit your Incometax Return return and e-veryfy your Income Tax return online using your netbanking account or Aadhar linked mobile .

For any query feel free to contact me

You can easily submit your ITR online and e-verify it online in few minutes. Just follow these steps and keep all information ready with you before starting the online ITR submission process.

Due Dates for e-Filling

Individual(Salaried+Business) - 31st August 2019

ITR1-4

Business/Organization with Audit - 30th September 2019

ITR-5

Open this link https://incometaxindiaefiling.gov.in
If you have not yet registered create your account it is simple and you will require your pan no and date of birth for login.



Update your Primary and Secondary Contact on MyProfile Option

In case of Organization Give Authorized Primary Contact details with PAN NO & LINKED MOBILE NO


After login goto e-File / Prepare and Submit Online ITR and in that select ITR type ITR-1 or ITR-4 and prefiill address option.


Keep Following data ready before starting Online ITR process

1. Form-16 - For salaried person Keep ready the Gross Total Income amount from Form-16 Part B Annexture

For other income check this list

2. Keep all allowed Deduction amount ready


IMP:Keep all other Bank IFSC code and account no ready with you.

Also keep ready if you have deposited more than Rs. 200000/ (Two Lacs) in any bank in the demonetization period 9-11-2016 to 30-12-2016

Also note that if you have deposited less than 2 lacs in demonetization period . Enter 0 amount on the form.

Frequenlly save your work using save draft button
After completion Click Preview Submit button and Submit the online ITR




After submitting online ITR next step is verify it.

Now you can verify it online.

Now printed copy of ITR verification form need not to send physically by post to Bangluru office.

Now you can use any one of the following method to generate EVC code to verify your return online.


Imp Note: Always check your Dashboard for pending actions


Select Generate EVC option from My Account Menu






You can see 3 options to Generate EVC


Option 1 - If your Aadhar id is linked with your mobile you will receive a OTP on aadhar linked mobile which you can use to e-verify your ITR.

Option 2 - You can e-veryfy your ITR using your NetBanking account.




Continue will show you the bank list just select your bank and login and do the online e-verification of your ITR




After log in into your net banking account
search for the Income Tax e-filling menu option .
This is sample of HDFC net banking account.
It will vary as per your bank.
Select that option just accept and confirm e-verification process.

This is the e-veryfy menu option from ICICI Bank 






After e-verifying your ITR through netbanking

You can download e-verified ITR Acknowledgement'

and ITR-Form , from dashboard menu of your

https://incometaxindiaefiling.gov.in account.

From dashboard menu select View Returns /Form

Click on respctive Ack.No

and download the pdf file.

To open pdf file you will require password

and it is combination of your pan no & birthdate

Example if your pan No is: ABCDE3010M and birthdate is 03/02/1961

Then password will be abcde3010m03021961













Plese post comment if this help you to submit your ITR 
Post a Comment
Do not forget to subscribe My Blog and yourtube channel-21 for more training videos and blog post.
We conduct customized training program for Individual , Employees and Managers of your Organization and Students


We conduct customized training program for Individual , Employees and Managers of your Organization and Students
To know more contact us using below link

https://www.itsolsoftware.in/training

Also contact us for compelete Digitalization solution for

Housing Society, School and Rotary Club



Friday, June 21, 2019

World Yoga Day


The best investment is invest time in yourself. 
 Make Yoga and  Exercise  part of your everyday schedule. 
 Wish you all a very happy World YOGA day

थोडे रोजच्या व्यायामा विषयी








Thursday, May 23, 2019

भारतीय राजकारण आणि निवडणूक 2019











मी २ फेब्रुवारी २०१४ ला त्या वर्षातील निवडणुकीचा आधी खालील ब्लाँग लिहिला होता 

Sunday, February 2, 2014


                                                 कर्मयोग आणि भारतीय राजकारण
सध्या भारतीय राजकारणातील अनेक राजकीय ग्रहांना सूर्य (पंतप्रधान) होण्याचे वेध लागले आहेत. बघू या कोण होते ते. मला राज कारणाचा जास्त अभ्यास नाही पण काही दिवसांपूर्वी वाचलेले मोदींच्या काल्पेनेतील भारत हे विचार आवडले.


चांगले विचार  हे चांगलेच असतात सत्तेवर कोणीही आले तरी त्यांनी ह्याचा पाठपुरावा करावयास हवा.
फक्त विरोधाला विरोध म्हणून चांगल्या विचारांना विरोध कोणी करू नये.खैरात म्हणून मिळालेल्या पैश्या पेक्षा कर्मयोगाने कष्ट करून मिळविलेला पैसा श्रेष्ट ह्याची शिकवण आणि आठवण हि आपली खरी भारतीय संस्कृति आहे ह्याची जाण तळागाळा पर्येंत करून देण्याची गरज आहे आणि त्या साठी तश्या योजना आखण्याची खरी गरज आहे.
भ्रष्टाचार मिटवणे हे गरजेचे आहे पण त्यामागे विकासाचा मुद्दा मागे पडावयास नको ह्याची पण खबरदारी घेणे हीच काळाची आणि भारतीय राजकारणाची खरी गरज आहे.

 -------------------------------------------------------

दिनांक २९-जानेवारी-२०१९

माझ्या मते मोदींनी त्याच्या कल्पनेतील भारताचे स्वप्न पूर्ण करण्या साठी त्यांच्या दृष्टीने परिपूर्ण प्रयत्न केलेत . परंतु ५ वर्षात १००% बदल घडू शकत नाही हे सर्वांना पटत असेल पण मान्य  नसेल कारण ह्यालाच राजकारण म्हणतात . 
पण शेवटी खूप अभ्यास केल्यानंतर पाल्याला ७०% मार्क मिळाल्यानंतर मिळवलेल्या ७०% मार्कांचे अभिनंदन  करायचे का न मिळालेल्या ३०% बद्दल त्याला दोष द्यायचा का जागृत पालक होऊन मुलाचे खरे गुण   ओळखून पुढील ध्येय्या साठी प्रोत्साहित करायचे हे सर्वस्वी पालकांच्या प्रगल्फतेवर अवलंबून असते.  आणि ह्या निवडणुकीत पालकाच्या भूमिकेत  मायबाप जनता आहे.  

पालकाची जबादारी मुलांच्या फक्त परीक्षेतील मार्कांवर लक्ष ठेवणे इतकीच नसते तर परीक्षा पास झाल्यानंतर  पाल्याला नौकरी किंवा व्यायसाय करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे हि पण असते नाहीतर आयुष्यभर कमावलेल्या पुंजीचे लाखाचे १२ हजार व्हायला वेळ लागत नाही. 



  • गरिबांना किमान वेतन देऊन भागणार नाही. किमान वेतनात आनंदी  कसे राहायचे हे पण त्यांना शिकवावे लागेल.  राहुल गांधी आणि त्यांचे सर्व राजकारणी सहकारी स्वतः किमान वेतन घेऊन हा नवीन राम  राज्याचा मार्ग  जनतेला सउधाहरण दाखवून देतील
  • मग उरलेल्या १०% टॅक्स भरणाऱ्या लोकांनाही ह्या साध्या सरळ मार्गाची जाणीव होईल आणि आयुष्यात नौकरी आणि बिझनेस करून सुखाचा जीव दुःखात घालवला ह्याची प्रचिती त्यांनाही होईल आणि त्यांची चुकलेली वाट शेवटी ह्या राजमार्गाला मिळेल आणि भारत एक संपूर्ण किमान वेतनात सुखी आणि  समाधानानं जगणाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जाईल.

पण भाऊ मग हे किमान वेतन देण्या साठी  पैसा कुठून येईल?
असो:

शेवटी लोकशाही आहे कल्पनेतला भारत कसा असावा ह्यावर कुणालाच निर्बंध नाही पण मतदारांनी  भविष्याची कल्पना करून आणि वास्तवाचे भान ठेऊन मतदान करावे एवढीच अपेक्षा आपण करू शकतो.